Wednesday, 11 February 2026

मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचा १०० टक्के निधी खर्च करून नियोजित विकासकामे पूर्ण करावीत

 मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचा १०० टक्के निधी खर्च करून

नियोजित विकासकामे पूर्ण करावीत

-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबई,दि. १०: मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाच्या अखर्चित निधीचा विनियोग करून नियोजित विकासकामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. मंत्रालयात आयोजित विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

 

विकासासाठी मिळालेला एकही रुपया अखर्चित राहता कामा नयेलोकाभिमुख कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने गतीने हालचाली कराव्याततसेच अतिरिक्त निधीसाठी लागणारा आवश्यक पाठपुरावा शासन स्तरावर तातडीने केला जाईल,असे मंत्री नितेश राणे म्हणाले.

 

विभागाला प्राप्त झालेला निधी अखर्चित न ठेवता तो १०० टक्के खर्च करून मच्छिमार बांधवांच्या हिताच्या आणि बंदरांच्या विकासाच्या योजना मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi