Tuesday, 10 February 2026

राज्यात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’अभियान राबविणार ग्रामपंचायतींसाठी पाच ते २ कोटींचे पुरस्कार, आरोग्य सुधारणा घडवून आणण्यावर भर

 राज्यात माझं गावआरोग्य संपन्न गावअभियान राबविणार

ग्रामपंचायतींसाठी पाच ते २ कोटींचे पुरस्कारआरोग्य सुधारणा घडवून आणण्यावर भर

राज्यात माझ गांवआरोग्य संपन्न गाव’ अभियान राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. दर आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च पर्यंतच्या कालावधीत हे अभियान राबविण्यात येईल. अभियानात गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या ग्रामपंयातींना आरोग्य संपन्न ग्राम म्हणून मानांकन व प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येणार आहे.

राज्यातील आरोग्य सेवांमध्ये गुणात्मक सुधारणा करणे व प्रत्येक नागरिकाला आरोग्याच्या मुलभूत सुविधा निर्माण करून देण्यासाठीसंसर्ग व असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी करून त्यांचे निर्मूलन करणे आणि माता व बालकांचे आरोग्यमान उंचावणे या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात नागरिकांच्या जीवनशैलीतआहारात बदल करण्यासाठी प्रोत्साहनप्रतिबंधात्मक उपाययोजनावेळेवर उपचार व पुनर्वसन हे चार स्तंभ असतील.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi