सायक्लोथॉन उपक्रमातून देशाची एकात्मता आणि अखंडत्वाचे दर्शन
- विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर
· वंदे मातरम् ' सुरक्षित तटम समृद्ध भारतम्' सायक्लोथॉन उपक्रम
मुंबई , दि. ११: विविध सुरक्षा दलांमुळे देशात विविध भाषा, संस्कृती असतानाही राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडत्व कायम आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या वंदे मातरम् सुरक्षित तटम समृद्ध भारतम्' सायक्लोथॉन उपक्रमातून देशाच्या एकात्मता आणि अखंडत्वाचे दर्शन घडत आहे, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी केले.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) वतीने गेट वे ऑफ इंडिया परिसरात आयोजित सायक्लोथॉन उपक्रमातील सायकलपटूंच्या स्वागत कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष ॲड.नार्वेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक प्रवीण रंजन, अतिरिक्त महासंचालक पद्माकर रणपिसे, विजय कुमार, क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, दिग्दर्शक बोनी कपूर, अभिनेता अहान शेट्टी, विश्वचषक विजेत्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment