मुंबई क्लायमेट वीक : हवामान कृतीसाठी भारताचा जागतिक मंच
मुंबईत होणारा भारतातील पहिला क्लायमेट वीक हा हवामान बदलावर केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृतीकडे नेणारा मंच ठरणार आहे. शासन, उद्योग, तज्ज्ञ, युवक आणि नागरिक यांना एकत्र आणत हा उपक्रम ग्लोबल साऊथ देशांसाठी हवामान नेतृत्वाचा नवा नमुना मांडणार आहे.
अन्नसुरक्षा, स्वच्छ ऊर्जा आणि शहरी शाश्वतता या तीन महत्त्वाच्या क्षेत्रांवर भर देत नवकल्पना, युवक सहभाग आणि लोकाभिमुख कार्यक्रमांद्वारे हवामान कृती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हवामान बदलावर उपाय म्हणजे सामूहिक जबाबदारी आणि तातडीची कृती हा यानिमित्ताने मुंबईतून दिला जाणारा संदेश स्पष्ट आहे....
No comments:
Post a Comment