Wednesday, 4 February 2026

अर्थसंकल्पातील 'विकसित भारत ' हा केवळ संकल्प नसून कोट्यवधी कामगार आणि सामान्यांच्या प्रगतीचा मार्ग

 अर्थसंकल्पातील 'विकसित भारत हा केवळ संकल्प नसून कोट्यवधी

कामगार आणि सामान्यांच्या प्रगतीचा मार्ग

 

कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

 

मुंबईदि. 01 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या १२ वर्षांपासून सुरू ठेवलेल्या नियोजनबद्ध विकासामुळे आज भारताची अर्थव्यवस्था जगासाठी एक आशेचा किरण ठरली आहे. केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला आजचा अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा खेळ नसूनतो देशातील गरीबशेतकरी आणि कष्टकरी कामगारांचे जीवनमान उंचावणारा ठरणारा आहेअशी भावना राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली आहे.

कामगार  मंत्री श्री फुंडकर म्हणालेराज्यातील पायाभूत सोयी सुविधांसाठी अर्थसंकल्पात दिलेल्या भरीव निधीमुळे राज्यातील इन्फ्रास्ट्रक्चरजागतिक स्तराचे होण्यास मदत मिळणार आहे. देशांतर्गत उत्पादनावर दिलेला भर आणि सूक्ष्मलघु व मध्यम उद्योगांसाठी केलेली १० हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद ही देशातील औद्योगिक क्रांतीला नवी दिशा देणारी आहे. वस्त्रोद्योग क्लस्टरच्या विकासामुळे आणि खनिज कॉरिडॉरमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतीलज्याचा सर्वाधिक फायदा तरुण कामगार वर्गाला होईल.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi