छत्रपती संभाजीनगरमधील वाळुंज औद्योगिक वसाहतीमध्ये जल प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया युनिट कार्यरत आहे. येथील सांडपाण्यावर 100 टक्के पुनर्वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे येथे प्रक्रिया केलेले पाणी खाम नदीत न सोडता त्याचा पुनर्वापर होण्यासाठी योग्य खबरदारी घेण्यात यावी, असे निर्देश मंत्री मुंडे यांनी दिल्या.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सिंग यांनी जालना व वाळुंज येथील प्रदूषणासंबंधीची माहिती देऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. जालना औद्योगिक वसाहतीमध्ये हवा प्रदूषणाची पातळी तपासण्यासाठी फिरत्या वाहनाद्वारे वायू गुणवत्ता निरीक्षण केले जात आहे. तसेच वाळुंज औद्योगिक वसाहतीमध्ये सांडपाणी प्रकल्पामध्ये प्रक्रिया केलेले सांडपाणी न पाठविणाऱ्या 53 उद्योगांना निर्देश देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
No comments:
Post a Comment