Sunday, 14 December 2025

गोवंश संरक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर

 गोवंश संरक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर त्यातून माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही. उलट भविष्यात ही योजना अधिक सक्षम कशी करता येईलयासाठी शासन प्रयत्नशील राहीलअसे त्यांनी सांगितले.

मात्र या कायद्याचा गैरफायदा घेणाऱ्यांबाबत शासन अतिशय संवेदनशील असूनअशा घटकांवर कठोर कारवाई केली जाईल. शेतकरी स्वतः जनावरांची वाहतूक करत असताना त्यांची अडवणूक झालीतर अशा प्रकरणात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहीलअसेही त्यांनी  सांगितले.

गोशाळांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाबाबत नियमित लेखापरीक्षण (ऑडिट) केले जाईल. भविष्यात बायोमेट्रिक प्रणालीद्वारे जनावरांची नोंदणी करण्याबाबतही विचार सुरू असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi