Tuesday, 11 November 2025

एआय’ च्या युगात जबाबदार पत्रकारितेचा नवा दृष्टिकोन घडवा

 ‘एआय’ च्या युगात जबाबदार पत्रकारितेचा नवा दृष्टिकोन घडवा

- अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा

 

मुंबईदि. 11 :- पत्रकारिता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआययांच्या संगमातून केवळ तांत्रिक कौशल्य नव्हेतर जबाबदार वृत्तनिर्मितीची नवीन मानसिकता घडविण्याची गरज आहेअसे प्रतिपादन कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी केले.

 

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृत्तपत्र तसेच डिजिटल माध्यम पत्रकारांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रशिक्षण कार्यक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी श्रीमती वर्मा बोलत होत्या. या कार्यक्रमात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंहरतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा.डॉ.अपूर्वा पालकरमंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे दिलीप सपाटे तसेच वृत्तपत्रेडिजिटल मीडिया आणि न्यूज एजन्सीजमधील पत्रकार उपस्थित होते.

 

अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती वर्मा म्हणाल्या कीकृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण हे सर्वांसाठी एकसारखे नसावे. प्रत्येकाचा अनुभव आणि तांत्रिक प्रावीण्य ओळखून प्रशिक्षण याची रचना संरचित केले पाहिजे. केवळ साधनांची ओळख न देतात्यांचा हॅन्ड्स-ऑन वापर शिकविणे ही खरी गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi