Monday, 6 October 2025

अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीस प्राधान्य द्यावे

 अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीस प्राधान्य द्यावे

- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

 

मुंबईदि. ६ :- अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील एकूण ४९० कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्ती व व्यवस्थापनाचा आढावा घेतला असूननवीन बंधारे उभारण्यापेक्षा विद्यमान बंधाऱ्यांच्या दुरुस्तीस प्राधान्य द्यावेअशा सूचना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिल्या.

मंत्रालयात अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीबाबत आयोजित बैठकीत मंत्री संजय राठोड अध्यक्षस्थानी होते. या बैठकीस खासदार अनिल बोंडेसचिव गणेश पाटीलसहसचिव विजय देवराजअवर सचिव प्रकाश पाटीलकार्यासन अधिकारी पराग पंडितप्रादेशिक जलसंधारण अधिकारी श्री. निपाणी व जिल्हा जलसंधारण अधिकारी भूपेश दमाहे उपस्थित होते.

मंत्री संजय राठोड म्हणाले कीया दोन्ही जिल्ह्यांतील बंधाऱ्यांची एकत्रित साठवण क्षमता ४८,२३३ सहस्र घन मीटर असूनदुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर एकूण १३,४४६ हेक्टर क्षेत्राचे सिंचन शक्य होईल त्यासाठी ९२ कोटी ७९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पहिल्या वर्षी ३६ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने निधी वितरित केला जाईल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi