Thursday, 30 October 2025

सायबर हल्ल्यांपासून वाचण्यासाठी फक्त तांत्रिक कौशल्य नव्हे तर योग्य मानसिकता विकसित

 सायबर हल्ल्यांपासून वाचण्यासाठी फक्त तांत्रिक कौशल्य नव्हे तर योग्य मानसिकता विकसित करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने २०१६ पासून सायबर सुरक्षेसाठी सक्षम पायाभूत व्यवस्था उभारली आहे. राज्यात २४ तास कार्यरत कमांड अँड कंट्रोल सेंटर’, ‘सायबर हेल्पलाइन आणि मोबाईल ॲप उपलब्ध आहेत. तसेच टेक्नॉलॉजी असिस्टंट इन्व्हेस्टिगेशन युनिट आणि एआय आधारित डिटेक्शन प्रणालीही कार्यरत आहे. महाराष्ट्र हे कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम स्थापन करणारे पहिले राज्य ठरले असल्याचेही मंत्री ॲड.शेलार यांनी अभिमानाने सांगितले.

यावेळी मंत्री ॲड.शेलार यांनी डीपफेक तंत्रज्ञानामुळे उद्भवणाऱ्या गंभीर धोक्यांकडेही लक्ष वेधले. डीपफेकमुळे केवळ व्यावसायिक नव्हेतर वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यही उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे त्याच्या ओळख आणि प्रतिबंधासाठी प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi