देशात डिजिटल उत्क्रांती होत आहे. प्रति सेकंद ५ हजार ८०० पेक्षा जास्त डिजिटल व्यवहार भारतात होत आहे. जगातील सात देशांनी युपीआयला मान्यता दिली आहेत. डिजिटल क्रांतीमध्ये डिजी लॉकरचाही मोठा वाटा आहे. देशात ५२ कोटी पेक्षा जास्त नागरिक डिजी लॉकरचा उपयोग करीत आहे. देशात दोन लाख १८ हजार गावांमध्ये भारत नेटच्या माध्यमातून इंटरनेटची सुविधा देण्यात आली आहे. भारत हा स्टार्टअपमध्ये जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशात १.९२ लाख स्टार्टअप सुरू झाले आहेत. बँकिंग क्षेत्राने आता आपल्या व्यापकतेकडे लक्ष द्यावे. जगातील पहिल्या दहा बँकांमध्ये भारताच्या बँकेचे नाव असावे अशी अपेक्षाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची फायनान्शिअल एक्सप्रेसचे संपादक श्यामल मुजुमदार आणि कार्यकारी संपादक ऋतुराज यांनी मुलाखत घेतली. मान्यवरांच्या हस्ते बँकिंग क्षेत्रातील विविध पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले. जीवन गौरव पुरस्कार फेडरल बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक श्याम श्रीनिवासन यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला बँकिंग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment