Saturday, 27 September 2025

मुख्यमंत्र्यांकडून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी संकटकाळात राज्यशासन पूरग्रस्तांच्या पाठीशी; सर्वतोपरी मदत करणार

 मुख्यमंत्र्यांकडून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी

संकटकाळात राज्यशासन पूरग्रस्तांच्या पाठीशी; सर्वतोपरी मदत करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक नागरिकाला

मदत करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

 

सोलापूरदि. २४ (जिमाका) :- जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले शेती पिकांचे, जनावरांचे, घरांचे व व्यावसायिकांचे खूप मोठे नुकसान झाले असून राज्य शासन संकटकाळात पूरग्रस्तांच्या पूर्णपणे पाठीशी असून नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पूरग्रस्त नागरिकांनी अशा संकटाच्या काळात धीर धरावा, असे आवाहनही त्यांनी केले.

 

                मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील निमगाव तसेच दारफळ सीना या गावाला भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केलीत्यांनी दोन्ही गावातील नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरेखासदार धैर्यशील मोहिते-पाटीलआमदार रणजीतसिंह मोहिते-पाटीलआमदार अभिजीत पाटीलविभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारमाजी खासदार रणजितसिंह निंबाळकरमाजी आमदार राम सातपुतेजिल्हाधिकारी कुमार आशिर्वादजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगमसोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, आदी उपस्थित होते.

 

                मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेअतिवृष्टी व पूर आल्यामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्वांना शासनाकडून मदत दिली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापुढेही पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत देण्यात येणार आहे. टंचाई काळात ज्या निकषाप्रमाणे मदत करण्यात येते त्याप्रमाणेच अतिवृष्टीओल्या दुष्काळातही मदत केली जाईल,  असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi