Tuesday, 30 September 2025

सामाजिक, राजकीय आंदोलनाच्या ७७ खटल्यांना दिलासा

 सामाजिकराजकीय आंदोलनाच्या ७७ खटल्यांना दिलासा

मंत्री ॲड.आशिष शेलार

मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक

 

मुंबईदि. २९ : राज्यातील धार्मिकराजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या २०१ अर्जदारापैकी ७७ अर्जदारांवरील खटले मागे घेण्याबाबत शासनाने नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने शिफारस केली आहेअशी माहिती सांस्कृतिक कार्यमाहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.

राज्यातील राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याबाबत शासनाने नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंत्री ॲड.शेलार होते. या बैठकीस विधि व न्याय विभागाचे प्रधान सचिव उदय शुक्लाअभियोग संचालनालयाचे संचालक अशोक भिल्लारेगृह विभागाचे उपसचिव चेतन निकम तसेच राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

स्त्रीविषयक गुन्हेगंभीर स्वरूपाचे खटलेवैयक्तिक व दिवाणी प्रकरणे ही शासनाच्या धोरणांतर्गत माफ केली जाऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा प्रकरणावरील खटले मागे घेण्यास स्पष्ट नकार देण्यात आला असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले. तसेचआमदारमाजी आमदारखासदार व माजी खासदार यांच्याशी संबंधित सहा प्रकरणांबाबतशासन निर्णय व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारमुंबई उच्च न्यायालयातच अंतिम निर्णय घ्यावा लागेल. त्या दिशेनेही पावले उचलण्यात येत असल्याचेही मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.

मंत्रिमंडळ उपसमितीकडे प्राप्त २०१ अर्जदारापैकी ७७ अर्जावर पुन्हा विचार करण्याची शिफारस करण्यात आली असून ही प्रकरणे पोलीस उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त क्षेत्रीय समितीपुढे ठेवण्यात येतीलअसे मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.

सामाजिक कार्यकर्तेराजकीय पक्षांचे कार्यकर्तेआंदोलकविचारधारात्मक चळवळींतील सहभागी यांच्यावर विनाकारण खटले दाखल करण्यात आले होते. अशा अनावश्यक खटल्यांपासून त्यांची मुक्तता करणेहे शासनाचे उत्तरदायित्व असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.

गणेशोत्सवनवरात्रोत्सवदहीहंडीकोरोना काळातील सामाजिक कार्यक्रमकामगार आंदोलन अशा विविध पार्श्वभूमीवर झालेले खटले नवीन अर्जांच्या आधारे पुनर्विचारासाठी खुले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात लवकरच पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. त्याआधी सर्व गणेशोत्सव मंडळेनवरात्रोत्सव मंडळेसामाजिक संस्थायुनियन प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी शासनाकडे अर्ज सादर करावेतअसे आवाहनही मंत्री ॲड.शेलार यांनी केले.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi