Tuesday, 23 September 2025

महिलांना स्वावलंबी बनविणे, त्यांना व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध करून देणे

 ’ राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेंतर्गत वैयक्तिक महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी ५० हजार रुपयापर्यंतचे अनुदान दिले जाते. त्याचबरोबर सामहिकरित्या व्यवसाय सुरु करण्यासाठी म्हणजेचमहिला बचत गट किंवा सामहिक गटांना व्यवसाय सुरु करण्यासाठी ७.५ लाख पर्यंतचे अनुदान या योजनेद्वारे दिले जाते.

 

महिलांना स्वावलंबी बनविणेत्यांना व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि समाजातील आर्थिक-सामाजिक प्रगतीत त्यांचा सहभाग सुनिश्चित करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेतर्गत पात्र महिलांना स्वतःचा उद्योगव्यवसाय किंवा उपक्रम सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

 

शासनाच्या विविध विभागांमार्फत समाजाच्या विकासासाठी वैयक्तिक तसेच सामहिक लाभाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ आदिवासी समाजालाही दिला जातो. त्याचबरोबरआदिवासी घटक कार्यक्रमाखाली आदिवासी विकास विभाग विविध योजना राबवितो. केंद्रराज्य जिल्हा पातळीवरील योजनांसाठी इतर प्रशासकीय विभागांना आदिवासी विकास विभागाकडून पूरक निधी वितरित केला जातो. केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना वैयक्तिक तसेच सामुहिक योजनांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. उत्पन्नउत्पन्न वाढीच्या योजना


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi