Tuesday, 23 September 2025

मंत्री नितेश राणे यांच्याकडे मत्स्यशेतकऱ्यांची मागणी मत्स्यव्यवसाय विकासासाठी बजेट वाढवा;

 मत्स्यव्यवसाय विकासासाठी बजेट वाढवा;

मंत्री नितेश राणे यांच्याकडे मत्स्यशेतकऱ्यांची मागणी

 

मुंबईदि. २२ : राज्यातील मत्स्यशेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांचे सक्षमीकरण यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी विस्तृत चर्चासत्र घेतले. या बैठकीत विविध जिल्ह्यांतील मत्स्यशेतकऱ्यांचे प्रतिनिधीसहकारी संस्था व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 बैठकीत मत्स्यव्यवसाय क्षेत्राला अधिक चालना मिळावी म्हणून राज्य शासनाने बजेट वाढवण्याची गरज असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लवकरच प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती दिली.

 मंत्री राणे म्हणाले कीमत्स्यव्यवसाय हा किनारपट्टीवरील हजारो कुटुंबांचा प्रमुख उदरनिर्वाह आहे. त्यामुळे या क्षेत्रातील मूलभूत सुविधाबाजारपेठ आणि प्रक्रिया उद्योग वाढवण्यासाठी सरकारकडून अधिक निधी आवश्यक आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे बजेट वाढवून देण्याची विनंती केली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi