Saturday, 16 August 2025

विकसित भारताच्या स्वप्नांमध्ये विकसित महाराष्ट्राचे विशेष योगदान

 विकसित भारताच्या स्वप्नांमध्ये विकसित महाराष्ट्राचे विशेष योगदान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मंत्रालयात 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण

 

मुंबईदि. 15 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश सातत्याने प्रगती करत आहे. केवळ एका दशकामध्ये भारताने जगातल्या अकराव्या अर्थव्यवस्थेपासून चौथ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंत मोठी मजल मारली आहे. आज भारताच्या संपूर्ण विकास व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र राज्य अतिशय वेगाने पुढे जात आहे. विकसित भारताच्या स्वप्नामध्ये विकसित महाराष्ट्र विशेष योगदान देत आहे. देशाची ही विकासगाथा यापुढे थांबणार नाही. प्रधानमंत्री यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आहेहा नारा अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताला आत्मनिर्भर करण्याकरता आपल्या सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागतीलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

देशाच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. या समारंभाप्रसंगी संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी  मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधेमुख्य सचिव राजेश कुमारश्रीमती अमृता फडणवीसवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष रजनीश सेठमुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेपोलीस महासंचालक रश्मी शुक्लावित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ताराजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरमुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणीमुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे यांच्यासह विविध विभागांचे अप्पर मुख्य सचिवप्रधान सचिवसचिवभारतीय सेनानौसेनावायुसेनाभारतीय तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारीवरिष्ठ पोलीस अधिकारीस्वातंत्र्य सैनिक आणि इतर विभागांचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi