अधिनियमातील कलम ५० (ब) मध्येच कलम ८०, ५० अ, ६९ आणि ४७ या कलमांचे उल्लंघन करणारी एक तरतूद होती. ही परस्परविरोधी तरतूद रद्द करण्यास येणार आहे.
या अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास कलम ६६ अ "साध्या कारावासाची शिक्षा" होती. त्याऐवजी आता "कोणत्याही प्रकारच्या कारावासाची शिक्षा" व सक्तमजुरीची शिक्षेपर्यंतची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कलम ४१ अअ अंतर्गत योजनेचे पालन करण्यासाठी कलम ६६ ब मधील आताच्या शिक्षेत "तीन महिने किंवा पंचवीस हजार रुपयांपर्यतचा दंड किंवा दोन्ही" ऐवजी "एक वर्ष किंवा दोन लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही" अशी सुधारणा करण्यात येणार.
उप किंवा सहाय्यक धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाविरुद्ध सुधारणा अर्ज सादर करण्यास देखील आता विशिष्ट मुदत घालून देण्यात येणार आहे. अधिनियमातील सुधारणांच्या अध्यादेशाच्या प्रारूपास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० मध्ये सुधारणा करण्यास मान्यता.
--००—
No comments:
Post a Comment