सर्व्हर देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे
दस्त नोंदणी तीन दिवस बंद राहणार
मुंबई, दि. १४ : नोंदणी विभागाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येत असुन यास्तव १४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १२ वाजेपासून ते १७ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत 'आय-सरीता' प्रणाली अंतर्गत दस्त नोंदणीसह इतर सर्व अनुषंगिक सेवा बंद राहतील.
संबंधित पक्षकार आणि दस्त नोंदणी करणारे व्यावसायिक यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय), महाराष्ट्र राज्य, पुणे उदयराज चव्हाण यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment