Saturday, 5 July 2025

बिहारमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) यशस्वीरित्या सुरू; १.५ कोटी घरांची पहिली BLO भेट पूर्ण, ८७ टक्के गणना फॉर्म वितरित

 बिहारमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) यशस्वीरित्या सुरू;

१.५ कोटी घरांची पहिली BLO भेट पूर्ण,

८७ टक्के गणना फॉर्म वितरित

 

मुंबईदि. ५ : बिहार राज्यात भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) उपक्रमांतर्गत १.५ कोटी घरांना बूथ स्तर अधिकारी (Booth Level Officers - BLO) यांनी दिलेली पहिली भेट पूर्ण झाली आहे. २४ जून २०२५ रोजी बिहारमधील ७.९० कोटी मतदारांपैकी ८७ टक्के म्हणजेच ६,८६,१७,९३२ गणना फॉर्म वितरित करण्यात आले आहेत.

यासारख्या कारणांमुळे अजूनही काही घरांपर्यंत BLO पोहोचू शकलेले नाहीत. याचे कारण घरे बंद असणेप्रवासावर असलेले नागरिकस्थलांतरित कुटुंबे किंवा मृत मतदार असू शकतात. BLO या दरम्यान प्रत्येकी तीन वेळा भेटी देतीलत्यामुळे वितरित फॉर्मची संख्या पुढील काळात अधिक वाढेलअशी अपेक्षा आहे.

गणना फॉर्म ऑनलाईन देखील उपलब्ध असून ECI च्या संकेतस्थळावर (https://voters.eci.gov.inआणि ECINET App वर अंशतः भरलेले फॉर्म डाउनलोड करता येतात. मतदार स्वतःही भरलेले फॉर्म ECINET App वर अपलोड करू शकतात.

राजकीय पक्षांकडूनही सक्रिय सहभाग मिळत असून राज्यात १,५४,९७७ बूथ स्तर एजंट्स (Booth Level Agents - BLAs) विविध राजकीय पक्षांकडून नेमले गेले आहेत. २ जुलै २०२५ रोजीपर्यंत भाजपकडून सर्वाधिक ५२,६८९ एजंट्स नेमले गेले आहेत. त्यानंतर RJD (४७,५०४), JD(U) (३४,६६९)काँग्रेस (१६,५००) यांचा क्रमांक लागतो. इतर पक्षांनीही BLAs नेमले असूनप्रत्येक एजंट दररोज ५० प्रमाणित फॉर्म सादर करू शकतो.

सध्या BLO कडे सुमारे ५ टक्के म्हणजेच ३८ लाख भरलेले व स्वाक्षरीयुक्त फॉर्म जमा झाले आहेत. आयोगाने वेळोवेळी "प्रथम समावेश" या घोषवाक्यावर भर दिला असूनया उपक्रमाचा उद्देश राज्यातील सर्व पात्र नागरिकांना मतदार याद्यांमध्ये समाविष्ट करणे हा आहे.

१ ऑगस्ट २०२५ रोजी प्रकाशित होणाऱ्या मसुदा मतदार यादीत जे आपले नाव समाविष्ट करू इच्छितातत्याने २५ जुलै २०२५ पर्यंत स्वाक्षरीयुक्त गणना फॉर्म सादर करणे आवश्यक आहे.

२ ऑगस्टपासून यादीतील नावांची पडताळणी मोठ्या प्रमाणावर सुरू केली जाईल. या मसुद्यावर कोणतीही हरकत किंवा दावा २ ऑगस्टपासून कोणत्याही राजकीय पक्षास किंवा सामान्य नागरिकास दाखल करता येईल.

अंतिम मतदार यादी ३० सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार असूनत्यानंतर जिल्हाधिकारी (DM) किंवा मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) यांच्याकडे अपील सादर करता येईलअसे भारत निवडणूक आयोगाने  प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi