Wednesday, 30 July 2025

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानात गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाचे ऐतिहासिक यश

 गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानात

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाचे ऐतिहासिक यश

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. ३० : गडचिरोली जिल्ह्यात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारण क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती झाली आहे. अल्प कालावधीत विक्रमी जलसाठा निर्माण करत गडचिरोलीने संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श निर्माण केला आहे. यावर्षी पावसाळा २० दिवस आधी सुरू झाल्याने कामाचा कालावधी कमी झालातरीही जिल्हा प्रशासनाच्या प्रभावी समन्वय आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे मोठे यश मिळाले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामगिरीचे कौतुक करत म्हटले कीगडचिरोली जिल्ह्याने जलसंधारण क्षेत्रात जे यश मिळवले आहेते संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. ही केवळ आकडेवारी नाहीतर ग्रामीण भागातील जलसुरक्षेच्या दिशेने टाकलेले एक भक्कम पाऊल आहे.

 गडचिरोली जिल्ह्यातील ९७ गावांमध्ये जलसाठे उभारले गेले असून २०२५-२६ या वर्षात ६४.५ कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यात आली. यामुळे हजारो नागरिकांसाठी पाण्याची उपलब्धता निश्चित झाली आहे. विशेष बाब म्हणजे याच वर्षात तब्बल ६,४४,६०१ घनमीटर गाळ काढून टाकण्यात आलाजो मागील दोन वर्षांच्या एकत्रित कामगिरीपेक्षा आठपट अधिक आहे. या कामांमध्ये विविध सामाजिक संस्थासंघटना यांचेही महत्त्वाचे योगदान आहेत.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेया कामगिरीत जिल्हा प्रशासन अर्थात गडचिरोली जिल्हाधिकारी यांचा मोठा सहभाग आहे. या वरुन असे लक्षात येते कीजिल्हा प्रशासनग्रामपंचायतीस्थानिक यंत्रणा आणि जनतेने एकत्रितपणे काम केल्यास कोणतेही ध्येय गाठणे अशक्य नाही. गडचिरोली जिल्ह्याने दाखवून दिले आहे की,  नियोजनबद्ध पद्धतीने आणि तांत्रिक मार्गदर्शनाने जलसुरक्षेसाठी मोठी झेप घेता येते. या यशस्वी मॉडेलचा अभ्यास करून संपूर्ण राज्यात अशा उपक्रमांची अंमलबजावणी केली जाईल. जलसंधारणाच्या माध्यमातून शेतीजनजीवन आणि पर्यावरण यांना स्थैर्य मिळेलअसा विश्वास मुख्यमंत्री श्री.फडणवीस मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi