रिस्पॉन्स टाईम कमी केला
रिस्पॉन्स टाईमसुध्दा कमी केला आहे असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ११२ नंबर डायल केला, तर ७.२३ मिनटात रिस्पॉन्स मिळेल. दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी ठोस प्रयत्न केले जात आहेत. मे २०२५ अखेरपर्यंत दोषसिद्धीचे प्रमाण ४४.२ टक्के इतके आहे. मे २०२४ मध्ये हे प्रमाण साधारणतः ४५ टक्के एवढं होतं. २०२४ च्या तुलनेत यंदा सायबर गुन्ह्यांमध्ये ८७८ ने घट झाली आहे. राज्यात ५० सायबर पोलीस ठाणे आणि ५१ सायबर लॅब सुरू आहेत. सायबर विषयक १९३० ही हेल्पलाइन सुद्धा सुरू केलेली आहे. पायरसीच्या १३२१ वेबसाईट बंद केल्या आहेत.
No comments:
Post a Comment