उदंचन जलविद्युत प्रकल्पाची वैशिष्ट्ये
उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी जलसंपदा विभाग आणि तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था मर्यादित यांच्यासमवेत सामंजस्य करार करण्यात आला. सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे (PPP) उदंचन जलविद्युत प्रकल्प उभा करण्याचे धोरण २०.१२.२०२३ रोजी निर्गमित करण्यात आले आहे. तिल्लारी उदंचन जलविद्युत प्रकल्पाद्वारे २४० मे.वॅ. वीजनिर्मित्ती अपेक्षित आहे. त्यामध्ये रू. १००८ कोटी गुंतवणूक व ३०० मनुष्यबळ रोजगार निर्मिती होणार आहे. प्रकल्पाचे वरील बाजूचे धरण (Upper Dam) हे तिल्लारी जलविद्युत प्रकल्पासाठीचे कोदाळी धरण (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) असून खालील बाजूचे धरण (Lower Dam) मौजे केंद्रे (ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) येथे आहे.
धोरणातील प्रमुख तरतूदी : जलाशयाचा वापर केल्यास प्रति जलाशय ₹१.३३ लक्ष प्रति मेगावॅट प्रतिवर्ष भाडेपट्टी तसेच औद्योगिक दराप्रमाणे पाणी शुल्क आणि जागेचे वार्षिक भाडेपट्टी शुल्क प्रचलित दराप्रमाणे असणार आहे.
यापूर्वी १५ अभिकरणासमवेत सामंजस्य करार (MoU) करण्यात आले असून एकूण ४५ प्रकल्पाद्वारे ६२,१२५ मेगावॅट वीज निर्मिती अपेक्षित आहे. त्यामुळे ३.४१ लक्ष कोटी इतकी गुंतवणूक व ९६,१९० मनुष्यबळ रोजगार निर्मिती होणार आहे.
या सर्व उदंचन योजनांसाठी प्रथम पाणीसाठ्याकरिता (One time water filling) एकूण (सर्व योजनांकरिता) अंदाजे १४.६२ टी.एम.सी इतके पाणी आवश्यक असून प्रतिवर्षी पुनर्भरणासाठी २.०० टी.एम.सी पाणी आवश्यक आहे. उदंचन योजनांच्या धरणांसाठी प्रथम भरणासाठी (First Filing) औद्योगिक दरान सुमारे ५७९.६९ कोटी व प्रतिवर्ष पुनर्भरणासाठी सुमारे ८०.५२ कोटी महसूल स्वरुपात मिळणे अपेक्षित आहे.
यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, वारणाचे एन. एच. पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment