कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा
मुंबई दि.२६ :- भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रामार्फत तर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना दि.२६ जुलै २०२५ रोजीचे सायंकाळी ५.३० ते दि. २८ जुलै २०२५ रोजीचे रात्रौ ८.३० पर्यंत ४.२ ते ४.७ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. याकालावधीत लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्र किनारी येण्याचा इशारा असल्याने प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment