Friday, 6 June 2025

समृद्धी महामार्ग, प्रवासातील सुलभता,नागपूर ते मुंबई दरम्यानचे अतंर अवघ्या आठ तासांव

 प्रवासातील सुलभता

इगतपुरी ते आमणे (ता. भिवंडी) हा 76 किमीचा टप्पा वाहतुकीस सुरु झाल्यानंतर ठाणे (आमणे) व नागपूर पर्यंतचा प्रवास आठ तासात करणे सहजतेने शक्य  होणार आहे. तसेच ठाणेमुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांना ही या महामार्गामुळे आपला  प्रवास सुलभरित्या व जलदपणे करणे शक्य होणार आहे.  त्यासोबतच शिर्डीअहिल्यानगर व नाशिक जिल्हयातील सिन्नर व इगतपुरी परिसरातील            शेतकऱ्यांना आपला  शेतमाल सुलभतेने  कमी कालावधीत  मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहचवता येणार आहे.  शेतक-यांनाउद्योजकांना,प्रवाश्यांना मुंबई महानगर प्रदेशात कामानिमित्त वरचवेर येणे जाणे हे अधिक सोयीस्कर होणार असून शैक्षणिक,सांस्कृतिक,आरोग्यविषयक संधीचे क्षेत्र विस्तारण्याच्या दृष्टीने ही हा महामार्ग निश्चितचं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सहाय्यक ठरणारा आहे.

 

राज्याच्या उप राजधानीला  राज्याच्या राजधानीपर्यंत जोडणार  नागपूर ते मुंबई दरम्यानचे अतंर अवघ्या आठ तासांवर आणणारा समृद्धी महामार्ग निश्तिचं महाराष्टाच्या औद्यागिकशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक विकासालाही गतीमान करणारा ठरेलयात शंका नाही.  

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi