Wednesday, 25 June 2025

दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ संकल्पनेचा चित्ररथ, वारीत ठरतोय लक्षवेधी

 दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ 

संकल्पनेचा चित्ररथवारीत ठरतोय लक्षवेधी

आपत्ती व्यवस्थापन विभागाची वारीत जनजागृतीची प्रभावी मोहीम

 

मुंबई, दि. २४ :- पंढरपूरची आषाढी वारी ही महाराष्ट्राची धार्मिकसांस्कृतिक आणि सामाजिक एकतेची परंपरा आहे. या वारीत ‘दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’. हा राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक अभिनव आणि स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाच्या माध्यमातून वारीमध्ये सहभागी लाखो वारकऱ्यांमध्ये आपत्ती विषयक सजगता निर्माण करण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

चित्ररथ आणि जनजागृतीची प्रभावी माध्यम

वारीमध्ये आकर्षक पद्धतीने सजवलेले चित्ररथपथनाट्य पथकमाहितीपूर्ण स्टॉल्समोबाईल व्हॅन आणि सुलभ भाषेतील माहितीपत्रके वापरून पूरचक्रीवादळदुष्काळगर्दी नियंत्रण यासारख्या आपत्तींविषयी माहिती दिली जात आहे. संकटाला घाबरू नकासज्ज राहा असा सकारात्मक संदेश देत ही दिंडी वारकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. दि. १९ जून पासून वारीबरोबर प्रारंभ झालेल्या या संकल्पनेसाठी ४ चित्ररथ असून ६० लोकांची टीम यामध्ये सहभागी झाली आहे. दि. ६ जुलै, आषाढी एकादशीपर्यंत या चित्ररथाद्वारे व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येणार आहे.

चित्ररथावर विठ्ठल-रखुमाईंची छायाचित्रेवारकरी परंपरेचे दर्शनतसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध उपाययोजनांचे चित्ररूप दर्शन घडते. यामुळे ही संकल्पना अध्यात्मिक श्रद्धेच्या सोबतीने सुरक्षिततेची जाणीव देखील देत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi