शेतकऱ्यांच्या प्रगतीत कृषि विद्यापीठाचे योगदान मोठे - कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
शेतकऱ्यांच्या प्रगतीत कृषि विद्यापीठाचे योगदान मोठे आहे. शेतकरी बांधवांना विकसित वाण मिळण्यासाठी कृषि विद्यापिठांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, त्यासाठी तीन दिवस चालणारी संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समिती परिषद महत्त्वाची ठरणार आहे. राज्यातील शेतकरीही विद्यापिठाच्या बरोबरीने प्रयोग करतो आहे, अशा शेतकरी बांधवांना विद्यापीठांनी सोबत घेऊन काम करावे. केंद्र शासनाने एक दिवस बळीराजासोबत हा उप्रकम सुरू केला असून राज्य शासनाने या उप्रकमात सक्रीय सहभाग घेतला आहे, असे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment