Wednesday, 9 April 2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त,https://twitter.com/MahaDGIPR, फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR, यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIP

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त

प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे यांची दिलखुलास’ व जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

 

मुंबई दि. ८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ आणि जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती दिनानिमित्त' 'सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजना व अंमलबजावणीया विषयावर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार दि. ९गुरूवार दि. १०शुक्रवार दि.११शनिवार दि. १२ आणि सोमवार दि. १४ एप्रिल २०२५ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. तर जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. १५ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८.०० वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या एक्स – https://twitter.com/MahaDGIPR, फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR, यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR, या लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राज्यातील अनुसूचित जातीविमुक्त जाती भटक्या जमातीइतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांच्या आर्थिक शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक उन्नतीसाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत विविध योजना आणि उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या दोन्ही विभागाच्या शंभर दिवसांच्या कामकाजाचा आराखडा देखील सादर करण्यात आला. या आराखड्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालांत पूर्व शिष्यवृत्ती योजनामुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनाभारतरत्न डॉ. आंबेडकर स्वाधार योजनासंजय गांधी निराधार अनुदान योजना अशा विविध योजनांच्या अंमलबजावणीवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल २०२५ रोजी १३४ वी जयंती साजरी करण्यात येत आहे. त्या निमित्ताने सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या योजनाउपक्रम आणि त्यांची अंमलबजावणी याविषयावर प्रधान सचिव डॉ. कांबळे यांनी दिलखुलास’ आणि जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi