Monday, 28 April 2025

शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन

 

शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'पुणे अर्बन डायलॉग आव्हाने आणि उपायकार्यक्रमाचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

पुणेदि२७आज महाराष्ट्राची ५० टक्के लोकसंख्या ५०० शहरात आणि उर्वरित लोकसंख्या ४० हजार गावात राहते आहेशहरांचा चेहरा आपण बदलू शकल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन देऊ शकतोयासाठी 'पुणे अर्बन डायलॉगसारखे मंथन आवश्यक आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

यशदाबर्वे चॅरिटेबल ट्रस्टइंटरनॅशनल सेंटर आणि पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने यशदा येथे आयोजित 'पुणे अर्बन डायलॉग-आव्हाने आणि उपायकार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होतेयावेळी उच्च  तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटीलनगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळआमदार भीमराव तापकीरविजय शिवतारेबापुसाहेब पठारेहेमंत रासनेमाजी मुख्य सचिव डॉ.नितीन करीर विभागीय आयुक्त डॉचंद्रकांत पुलकुंडवारयशदाचे महासंचालक निरंजन सुधांशूपुणे महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसलेपिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे युक्त शेखर सिंह  यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेपुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा संपूर्ण विकास आराखडा रद्द करून पहिल्यांदा रस्त्यांचे जाळे निर्माण करायचे आणि नगर रचना योजनांचा उपयोग करण्याचा विचार आहेआज आपण पीएमआरडीएच्या माध्यमातू भविष्यातील पुणे असलेले नवीन शहर अथवा वसाहत तयार करत असताना मोठे रस्ते आवश्यक आहेतत्याचबरोबर नागरी वाहतूक महत्वाचा विषय असून महानगर एकीकृत वाहतूक प्राधिकरण तयार करण्यात ये आहेप्रवासाच्या शेवटापर्यंत वाहतुकीची सुविधा मिळाल्याशिवाय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर हो नाही.

मुंबईमध्ये एकच तिकिटावर उपनगरी रेल्वेमेट्रोमोनो आणल्या असून वॉटर टॅक्सीदेखील त्यात उपलब्ध असतीलयात कोणत्याही व्यक्तीला प्रवासाच्या आराखडा ज्यात त्याच्या ०० मीटरवरून प्रवासाची साधने आणि गंतव्य स्थानापर्यंतचे प्रवासाचे पर्याय मिळतीलयाची पहिल्या टप्प्यात पुढच्या  महिन्यात मुंबईत अंमलबजावणी होणार असून पुढे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात होणार आहे.

पुढील काळात मार्गांचे मॅपिंग रणार असून त्यासाठी गुगल सोबत रार करत आहोतत्यातून सिग्नलचे सिमुलेशन करून वाहतूक व्यवस्थापन करण्यात येणार आहेपुण्यात पीएमपीएमएल बस व्यवस्थेला मेट्रोचे जोड देऊन वाहतूक व्यवस्था बळकट करण्याचे प्रयत्न सुरू आहेतमेट्रोला फिडर सेवा करणे गरजेचे आहेत्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेपुण्यात त्यासाठी पुणे एकीकृत हानगर परिवहन प्राधिकरण (पुम्टातयार केले आहे.


शासनाने गेल्या काळात पहिल्या प्प्यात पूर्वी कधीच झाले नव्हते ते १७ क्षेत्रीय आराखडे केलेमुंबईपुणे महानगरपालिकानाशिकछत्रपती संभाजीनगर आदी क्षेत्रांचे विकास आराखडे केलेते करताना विकास हा नजरेसमोर ठेवल्याने कोणतेही वाद निर्माण झाले नाहीतआज  नागरीकरणाच्या प्रक्रियेत पण मोठ्या प्रमाणात नगरपालिकानगरपंचायती तयार केल्या असून अशा ठिकाणी व्यवस्थित नियोजनाने गुंतवणूक करून वाढणाऱ्या हद्दीमध्ये नागरिकांसाठी सुगम जीवनशैली आणण्याची संधी आपल्यासमोर आहे.

मुख्यमंत्री म्हणालेदेशातील शहरे आज बकाल झालेली दिसतातग्रामीण भागातील नागरिक शिक्षणआरोग्यनोकरीसंधीमनोरंजन आदी साठी शहरात येतातअशा परिस्थितीत आपण गृहनिर्माण केले नाही तर झोपडपट्टी तयार होतातनदी नाले बुजवून अतिक्रमणे होताशहरे वाढल्यामुळे घनकचरासांडपाणीपिण्याच्या पाण्याची समस्या,  निर्माण होते आणि शहरे व्यवस्थापनाच्या बाहेर गेलेलीशाश्वत आणि राहण्यायोग्य राहिली नाहीत हे अचानक लक्षात येते.

महाराष्ट्रात वाढत्या नागरिककरणाच्या  पार्श्वभूमीवर केवळ दोन तीन शहरेच नव्याने वसवली (ग्री फील्डआहेतमात्र इतर अस्तित्वातील शहरात वीन सुविधा करणे आवश्यक असून ते आव्हान आहेआपण जो नागरी आराखडा करतो तो अंमलबजावणी योग्य असला पाहिजेअंमलबजावणीची व्यूव्हरचनात्यासाठी निधी उभारणीची व्यूव्हरचना पाहिजेतसेच अंमलबजावणीची इच्छाशक्ती सली पाहिजेअसे श्रीफडणवीस म्हणाले.

या चर्चासत्रात घेतलेला नागरी प्रशासनाचा विषय महाराष्ट्रासाठी हत्वाचा आहेआता तंत्रज्ञानाचा उपयोग करून छोट्यात छोट्या नगरपंचायतीचेही सु-प्रशासन करू शकतोत्यामुळे नागरी प्रशासनाचा पुनर्विचार आणि पुनर्रचना करणे गरजेचे आहे.  वातावरणातील बदलामुळे अचानक मोठ्या प्रमाणात होणाऱ्या  आपत्ती व्यवस्थापनाबाबत विचार विनिमय होणे महत्वाचे आहेचर्चासत्र पुण्याला केंद्रस्थानी ठेऊन होत असले तरी संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाचर्चेतून समोर आलेले मुद्दे शासनाला मिळाल्यावर एक रोड मॅप करू त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करूअसेही मुख्यमंत्री म्हणाले.

गोबर्वे यांना १११ व्या जयंती निमित्त अभिवादन करून  पुण्याचे हिले प्रशासक असलेले गोबर्वे हे एक दृष्टे प्रशासक 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi