Wednesday, 26 March 2025

नदी पूररेषांवरील वाद सोडवण्यासाठी समिती स्थापन होणार

 नदी पूररेषांवरील वाद सोडवण्यासाठी समिती स्थापन होणार

उद्योग मंत्री उदय सामंत

 

मुंबईदि. 25 :  राज्यात नद्यांच्या पूरपातळीसाठी आखलेल्या निळ्या आणि लाल रेषांसंदर्भात प्रश्न निर्माण झाले आहेत. निळ्या आणि लाल रेषामधील अपूर्ण राहिलेले सर्वेक्षण जलसंपदा विभागामार्फत करण्यात येईल. निळ्या आणि लाल रेषांसंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांवर तातडीने  उपाययोजना करण्यासाठी समिती स्थापन केली जाईल असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

याबाबत सदस्य शंकर जगताप यांनी लक्षवेधी सूचना मांडली.

उद्योग मंत्री सामंत म्हणालेराज्यात नद्यांच्या पूरपातळीसाठी आखलेल्या निळ्या आणि लाल रेषांसंदर्भात निर्माण झालेल्या वादांवर तोडगा काढण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत नव्याने सर्वेक्षण व अभ्यास करण्यात येईल.

नव्या सर्वेक्षणाच्या आधारे पूररेषांची मर्यादा निश्चित केली जाईल. तसेच या हद्दीत जर अवैध विकास परवानगी दिली असल्यासती तत्काळ रद्द केली जाईल आणि संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

****

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi