Wednesday, 4 December 2024

रामदास स्वामी यांचे क्षेत्र श्रीजांबसमर्थ येथील घागरीचा चमत्कारिक अनुभव* 🚩✍ श्री. दीपक कुळकर्णी ------------------- 🕉️

*श्री रामदास स्वामी यांचे क्षेत्र श्रीजांबसमर्थ येथील घागरीचा चमत्कारिक अनुभव* 🚩✍ श्री. दीपक कुळकर्णी ------------------- 🕉️ ------------------- १) समर्थ रामदास स्वामी चरित्रात उल्लेख असलेली हीच ती तुपाची घागर जिच्यातून आजही तूप निघते आहे. परंतु घागर रिकामी होत नाही , सध्या ही घागर श्री समर्थ ऱामदासस्वामी यांच्या जन्मस्थानी श्री क्षेत्र जांबसमर्थ; ता. घणसवंगी; जि. जालना येथील श्रीराम मंदिरात ठेवण्यात आली आहे. तिथे ह्या समर्थांनी पावन केलेल्या घागरीचे दर्शन आपणास होते. २) जांबेच्या निवासासाठी मोफत भक्तनिवास व मोफत प्रसादाची व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच समर्थांच्या घराण्यातील रामपंचायतन व ज्या मारोती मंदिरात समर्थांना अनुग्रह झाला ते मारोती मंदिर उपलब्ध आहे. ५ किलोमीटर वर ज्या लग्नबोहल्यावरून श्री समर्थांनी पलायन केले तो बोहला आसनगाव येथे उपलब्ध आहे. ३) रामनवमीच्या आदल्या दिवशी म्हणजे अष्टमीला श्री क्षेत्र जांबसमर्थ इथ श्रीरामांचा भंडारा असतो, त्यावेळी गावात ५-६ लाख लोक जमतात, भगवान श्रीराम व श्री समर्थांचे मुर्तीरुप दर्शन घेऊन भक्त पावन होतात. गावकरी पण पाच सहा लाख लोकांच्या सेवेत तत्पर असतात, तिर्थयात्रींची राहण्याची भोजनाची स्नानाची व्यवस्था अतिशय उत्तमपणे व विनामूल्य गावकरी लोक करीत असतात. व कुठेही काहीच कमतरता दिसत नाही, हा समर्थांचा चमत्कारच ! ४) ह्या घागरीबद्दल सत्यकथा ऐकायला मिळाली ती अशी --- श्री रामदास स्वामींनी श्रीरामनवमी निमित्ताने भंडाऱ्याचे आयोजन त्याकाळी नुकतेच सुरु केले होते, श्री समर्थांच्या क्रुपेने कुठेच काही कमी पडत नव्हते, पण अचानक वरणभातावर वाढण्यासाठीचे साजुक लोणकढी तुप संपले, अर्थात श्री समर्थ रामदास स्वामी महान योगी तपस्वी व आपल्या योगसाधनेने काहीपण साध्य करणारे, त्यांनी तुप कमी पडल्याने ह्या वरील घागरीस दोर बांधुन बाजुच्या विहीरीत सोडले व घागरभर पाणी वर ओढले, व सेवेकऱ्यांना सांगितले ह्यातुन पंगतीला तुप वाढायला सुरूवात करा, सेवेकऱ्यांना पाणी तुप म्हणुन कसे वाढायचे हे कोडे पडले, समर्थांनी सेवेकऱ्यांना सांगितले माझा श्रीराम बघुन घेईल पुढे काय करायचे ते तुम्ही तुप वाढायला सुरुवात करा, सेवेकऱ्यांनी पंगतीला पाणी अर्थातच तुप वाढायला सुरुवात केली, त्या घागरीतील पाणी तुपात परिवर्तीत झाले व सगळ्या तीर्थयात्रींचे भोजन होईस्तोवर त्या घागरीतले तुप शेवटपर्यंत संपलेच नाही. शेवटी सर्व पंक्ती उठल्यावर समर्थांनी ती घागर घेतली व परत पाणी आणलेल्या विहीरीत रिकामी केली म्हणजे विहीरीचे पाणी देखील समर्थांनी विहीरीला परत केले. ५) आज सुद्धा रामनवमीच्या आदल्या दिवशी अष्टमीला जेव्हा भंडारा असतो तो घेतल्यानंतर प्रत्येक तिर्थयात्रींना तिथे संस्थानतर्फे ह्याच घागरीतुन साधारणतः १०० ग्रॅम तुप मोफत वाटप केले जाते. आश्चर्य म्हणजे घागरीतले तुप संपतच नाही, हा चमत्कार आपण स्वतः अष्टमीच्या दिवशी तिथे उभे उपस्थित राहुन बघु शकता. अवर्णनीय, नेत्रदीपक, चमत्कारिक सोहळा असतो. प्रत्येकाने ह्या सोहोळ्याचा लाभ घ्यावा अशी मी आग्रहपुर्वक विनंती करीत आहे. ६) श्री समर्थांच्या ह्या चमत्कारिक घागरीची माहिती, श्री क्षेत्र जांबसमर्थ इथल्या समर्थ रामदास स्वामींच्या मठातील ट्रस्टचे २४ तास सेवेकरी असणारे श्री स्वप्नील रामदासी ह्यांच्याशी फोनवर चर्चा करत असताना मला त्यांच्याकडून मिळाली, त्याबद्दल श्री स्वप्नील रामदासींचे आम्ही आभारी आहोत. *साभार:* श्री स्वप्नील रामदासी, श्री क्षेत्र जांबसमर्थ. भ्रमणध्वनी: 9146519609 *जय जय रघुवीर समर्थ* 🚩 *"श्रीराम समर्थ"* 🚩

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi