*** **मीठ*........*
*काल एक पोस्ट वाचनात आली, की पंगतीत मीठ वाढणारा परत येत नाही तसच काही माणसं देखील* *आयुष्यातून एकदा* *निघून गेले की परत* *येत नाहीत. बहुदा ते* *गेल्यावरच त्यांची किंमत कळते.*
*का घडतं असं??*
*मिठाचं महत्व जेव्हा पानात असतं तेव्हा कळतच नाही. कारण त्यावेळी माणसाचं लक्ष पानात येणाऱ्या गोड* *पदार्थावर असतं. तो पदार्थ कुठला, कसा, त्याची चव कशी, तो* *चांगल्या तुपापासून बनवलाय का? ते खाऊन आपल्याला काही त्रास होऊ शकतो का?? हे काहीच* *माहीत नसतं तरी देखील तो गोड पदार्थ हवासा असतो. कारण मोह. असं म्हणतात की संकट हे नेहमी सुंदर रूप घेऊनच येतं.*
त्या *गोड पदार्थाच्या मोहापायी ताटातल्या मिठाकडे जराही लक्ष जात नाही. कारण* *आपण त्याला कुठेतरी गृहीत धरायला* *लागतो. त्याचा खारटपणा नकोसा वाटतो. ते आपल्या पानातील इतर* *पदार्थात मिक्स होऊ नये म्हणून आपणच त्याला स्वतःहून बाजूला करतो. त्यात कधी वाटीतील रस्सा* *भाजी वगैरे सांडली तर ते पानात असून देखील उपयोग नसतो.*
*नको वाटतात ना आपल्या आयुष्यात अशी मिठासारखी माणसं? कारण ती तुमच्या चांगल्यासाठी सल्ला देतात,* *कधी हक्काने कान धरतात तर कधी पोटतिडकीने समजावून सांगतात. नकोच वाटतात, कारण त्यावेळी* *गोड* *पदार्थाची झिंग चढलेली असते. त्याशिवाय पानातील इतर पदार्थ दिसत नाही तर वाटीमागे असलेलं ते एवुढंस* *मीठ* *काय दिसणार ना?? पण जेव्हा तोच गोड पदार्थ खाऊन तड लागते ना तेव्हा पाण्याच्या* *ग्लास मध्ये* *लिंबाची फोड पिळली जाते आणि हात आपसूक मीठ शोधायला लागतो. कारण त्याशिवाय खाल्लेलं अन्न* *पचणार कसं??*
*म्हणून देवाने वाढलेल्या ह्या आयुष्यरूपी पानात प्रत्येक व्यक्तीला महत्व असतं आणि ते द्यावं. आपल्याला ती व्यक्ती आवडो की न आवडो ती आयुष्यात आलीय ना म्हणजे नक्कीच मागील जन्माचा संबंध असतो आणि मिठासारखी माणसं तर नक्कीच ओळखावी भलेही ती तुमच्या आयुष्यात फार* *महत्वाचे नसतीलही पण निदान वाईट तर करणार नाहीत ना?? ....* 🙏🌷🙏
No comments:
Post a Comment