राज्यात तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात
सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे ६१.४४ टक्के मतदान
मुंबई, दि. ७ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपली असून अकरा मतदार संघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६१.४४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.
तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :-
रायगड - ५८.१० टक्के
बारामती – ५६.०७ टक्के
उस्मानाबाद - ६०.९१ टक्के
लातूर - ६०.१८ टक्के
सोलापूर – ५७.६१ टक्के
माढा – ६२.१७ टक्के
सांगली - ६०.९५ टक्के
सातारा - ६३.०५ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ५९.२३ टक्के
कोल्हापूर - ७०.३५ टक्के
हातकणंगले - ६८.०७ टक्के
0000
No comments:
Post a Comment