Tuesday, 21 May 2024

राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान

 राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात

अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान

 

            मुंबईदि. २० : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि‍ शेवटच्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली असून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

 

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

 

धुळे- ५६.६१ टक्के

दिंडोरी- ६२.६६  टक्के

नाशिक -  ५७.१०  टक्के

पालघर- ६१.६५  टक्के

भिवंडी- ५६.४१  टक्के

कल्याण - ४७.०८ टक्के

ठाणे - ४९.८१ टक्के

मुंबई उत्तर – ५५.२१  टक्के

मुंबई उत्तर मध्य -  ५१.४२ टक्के

मुंबई उत्तर पूर्व – ५३.७५ टक्के

मुंबई उत्तर पश्चिम – ५३.६७  टक्के

मुंबई दक्षिण – ४७.७०  टक्के

मुंबई दक्षिण मध्य- ५१.८८ टक्के

0

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi