Thursday, 18 April 2024

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर पुढे सरसावले पहिल्यांदाच राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय सदिच्छादूत करणार मतदारांना आवाहन 16 राज्यस्तरीय सदिच्छादूत

 मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर पुढे सरसावले

पहिल्यांदाच राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय

सदिच्छादूत करणार मतदारांना आवाहन

16 राज्यस्तरीय सदिच्छादूत

            मुंबई, दि. 17 :- यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावामतदान हक्काचे महत्व सांगण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारजागृतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदार जागृतीच्या या उपक्रमांना आता कलाक्रीडासाहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची सदिच्छादूत’ म्हणून साथ लाभली आहे. पाहिल्यांदाच राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय सदिच्छादूत मतदारांना मतदानाचे महत्व समजून देण्यासाठी आवाहन करणार आहेत.

            समाज माध्यमेमुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच जाहिरातफलकभित्तीपत्रकाद्वारे हे सदिच्छादूत लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. राज्यस्तरीय सदिच्छादूतांमध्ये पद्मभूषण अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकरसाहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिकअभिनेते प्रशांत दामलेअभिनेत्री मृणाल कुलकर्णीअभिनेत्री डॉ. निशिगंधा वाडअभिनेत्री उषा जाधवअभिनेत्री सान्वी जेठवानीमहिला क्रिकेटपटू स्मृती मनधनासुवर्णपदक विजेती नेमबाज राही सरनोबतअर्जुन पुरस्कार सन्मानित महिला धावपटू ललिता बाबरअर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडेतृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंततृतीयपंथी प्रणीत हाटेतृतीयपंथी झैनाब पटेलदिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीतदिव्यांग कार्यकर्ती सोनल नवनगुल यांचा समावेश आहे.

आता प्रत्येक जिल्ह्यासाठी सदिच्छादूत

            प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारे असे काही मान्यवर असतात जे समाजाला प्रेरित करतात. हेच मान्यवर आता सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत. अहमदनगरसाठी पद्मश्री राहीबाई पोपरेप्रणिता सोमणशिवम लोहकरेमिलिंद शिंदेआरुष बेडेकरवेदांत वाघमारे हे अहमदनगर जिल्ह्यात मतदारांनी मतदान करावे यासाठी आवाहन करणार आहेत. अकोल्यात पलक झांबरे आणि अमरावतीमध्ये संकेत जोशी मतदारांना आवाहन करणार आहेत. बीडमध्ये योगेश्वर घाटबंधेमयुरी लुतेप्रमिला चांदेकर तर बुलढाण्यात प्रथमेश जावकर आणि मोनाली जाधव हे सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

            औरंगाबादमध्ये नवेली देशमुखउस्मानाबादमध्ये राहुल लखाडेधुळेमध्ये वैष्णवी मोरे आणि पार्वती जोगीगडचिरोलीमध्ये पद्मश्री डॉ. परशुराम खुणेगोंदियामध्ये मुनालाल यादवजळगावमध्ये निलिमा मिश्राजालनामध्ये किशोर डांगेडॉ. निकेश मदारे आणि निशा पुरी सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

            कोल्हापूरमध्ये वीरधवल खाडेलातूरमध्ये बसवराज पैकेमेघा पवारसृष्टी जगतापमुंबई शहरामध्ये दिव्यांग कार्यकर्ता निलेश सिंगीतमुंबई उपनगरासाठी दिव्यांग कार्यकर्ती विराली मोदी हे सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत. याशिवाय नागपूरसाठी जयंत दुबळे आणि ज्योती आमगेनांदेडसाठी भाग्यश्री जाधवसृष्टी जोगदंडकपिल गुडसुरकरनंदूरबारसाठी प्रतिक कदमरिंकी पावरा आणि शिवाजीराव मोरे काम करणार आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी चिन्मय उद्गगीरकरसागर बोडकेपालघरसाठी विक्रांत केणीपूजा पाटीलशुभम वनमाळीभाविका पाटीलपुण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आर.जे. संग्राम खोपडे हे निवडणूक सदिच्छादूत म्हणून काम करतील.

            रायगडसाठी तपस्वी गोंधळीरत्नागिरीसाठी संकेत चाळके आणि पल्लवी मानेसांगलीमध्ये संकेत सरगरसातारामध्ये आदिती स्वामीसिंधुदुर्गमध्ये ओमकार अटारीसोलापूरमध्ये तानाजी गालगुंडेआनंद बनसोडेप्रार्थना ठोंबरे तर ठाण्यात अशोक भोईरवर्ध्यात निमिश मुळ्ये निवडणूक सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

            यवतमाळमध्ये अंकुर वाढवेआकाश चिकटेचंद्रपूरमध्ये शेख गायसुद्दिन आणि हिंगोलीमध्ये महेश खुळखुळे काम करणार आहेत. परभणीमध्ये संकर्षण कऱ्हाडेप्रशांत पाईकरावशुभम म्हस्केसुनील तुरुकमानेडॉ. राजगोपाल कलानी निवडणूक सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

000000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi