*कृतज्ञता*
कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण त्यांच्यासोबत कसे वागलो हे महत्त्वाचे नाही का? पुढे कसं वागायचं याचा विचार कराच .आपण कुठे चुकलो याचे आत्मचिंतन नक्कीच करा.या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख,अडचणी नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्या विधात्यालाही हे सर्व भोगावं लागलंय . आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत.सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो. *कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं.* *मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं.* आपल्याशी कोण कसही वागेना आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं. इतकं चांगलं की *विश्वासघात* *करणारा ही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला* *पाहिजे.* आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते. *आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी घाबरून जाऊ नका.फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे.* जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत.जगणं कोणाचंही सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं, *सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो.*
ज्या व्यक्तीने तुम्हाला संधी दिली
तुमची पात्रता पाहून नोकरी दिली, तीच पात्रता अनेक व्यक्तीकडे आहे त्याना अजूनही नोकरी नाही.तुम्ही रोज सुरक्षितपणे जो रस्ता वापरता, तोच रस्ता आहे जिथे अनेकांनी आपले मौल्यवान जीव गमावले.. तुम्ही हॉस्पिटलमध्ये वापरलेला बेड, तुम्ही बरे झालात आणि डिस्चार्ज मिळाला, त्याच बेडवर इतर अनेकांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पावसाने तुमच्या शेतात चांगले पीक आले, त्याच पावसाने दुसऱ्याचे शेत उध्वस्त केले.कारण तुमच्याकडे जे काही आहे ती फक्त *"नियतिची कृपा"आहे*
तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींचा तो दाता आहे.म्हणुनच तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी *कृतज्ञ* रहा. पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे. *दुसऱ्यांबद्दल वाईट बोलुन त्यांचे दुर्गुण सांगून,आपला चांगुलपणा आणि कर्तृत्व कधीच सिद्ध होत नसते.*
कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते, ज्याच नाव आहे, आत्मविश्वास.
ज्यांनी ज्यांनी तुम्हाला मदत केली,
ज्यांच्यामुळे तुमचे आयुष्य बदलले,
ज्यांच्यामुळे तुमचे स्वप्न पूर्ण झाले,
त्या व्यक्तीबद्दल नेहमी कृतज्ञ राहा,
विधात्याचे व त्या व्यक्तीचे नेहमी आभार व्यक्त करा
समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले बनण्याचा नक्कीच प्रयत्न करा,
जमलं तर बघा विचार करून 🙏
🙏🌹🙏🌹🙏🌹
No comments:
Post a Comment