Wednesday, 13 March 2024

रिंगाण’ कादंबरीसाठी कृष्णात खोत यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान 70 वर्ष पूर्ण झाल्याने अकादमीकडून 11-16 मार्च दरम्यान साहित्य महोत्सव

 रिंगाण’ कादंबरीसाठी कृष्णात खोत यांना

साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान

70 वर्ष पूर्ण झाल्याने अकादमीकडून 11-16 मार्च दरम्यान साहित्य महोत्सव

 

             नवी दिल्ली12 : नामवंत लेखक व कादंबरीकार कृष्णात खोत  यांना रिंगाण’ कादंबरीसाठी मराठी भाषेकरिता  साहित्य अकादमी पुरस्कार आज प्रदान करण्यात आला.

            कमानी सभागृहात झालेल्या सोहळ्यात साहित्य अकादमी पुरस्कार 2023 चा सादरीकरण सोहळा हे महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले. ओडिसा राज्याच्या प्रख्यात साहित्यिक व प्रमुख पाहुण्या प्रतिभा राय यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

             अध्यक्ष माधव कौशिकउपाध्यक्ष कुसुम शर्मा तसेच सचिवके. श्रीनिवासराव मंचावर उपस्थित होते. अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील 24 प्रादेशिक भाषांसाठी  साहित्य अकादमी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कृष्णात खोत यांच्या लेखन कार्याविषयी

            श्री. खोत यांना मराठी कादंबरी रिंगाण’ करिता साहित्य अकादमीतर्फे गौरविण्यात आले. साहित्य अकादमी पुरस्काराचे स्वरूप ताम्रपत्रशाल आणि रुपये एक लाख रोख रक्कम असे आहे.

            मूळचे कोल्हापूर येथील कृष्णात खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवाशी आहेत. पन्हाळा विद्यामंदिर येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. सध्या ते कळे येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिकवितात.

            कृष्णात खोत हे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रदेश समूहनिष्ठ कादंबरी लेखनाने कादंबरीकार कृष्णात खोत’ म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या शतकारंभी श्री. खोत यांनी त्यांच्या लेखन कार्याला सुरूवात केली आणि मराठीत लक्षणीय ठराव्यात, अशा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. गावठाण’ (२००५), ‘रौंदाळा’ (२००८), ‘झड-झिंबड’ (२०१२), ‘धूळमाती’ (२०१४), ‘रिंगाण’ (२०१८) या त्यांच्या प्रकाशित कादंबऱ्या असूनया कादंबऱ्यांमधून बदलत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण केले आहे. याशिवाय 'नांगरल्याविन भुईहे त्यांनी लिहिलेले ललित व्यक्तिचित्रण प्रकाशित झाले आहेत. गावसंस्कृती आणि बदलते खेड्यातील जीवनसंघर्ष त्यांच्या लिखाणाचा विषय आहे. त्यांना विविध पुरस्कारांनी आणि सन्मानांनी नावाजले गेले आहे. यशवंतराव चव्हाण राज्य साहित्य पुरस्कारमहाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका) पुरस्कारवि. स. खांडेकर पुरस्कारबाबूराव बागूल शब्द पुरस्कारभैरूरतन दमानी साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 

रिंगाण या कादंबरी विषयी

            'रिंगाणया कादंबरीला मराठी भाषा करिता साहित्य अकादमी पुरस्कार 2023 साठी आज श्री खोत यांना पुरस्कार प्रदान झाला. 'रिंगाणकादंबरीत जंगलात राहणाऱ्या समुदायाच्या विस्थापित आयुष्याचे चित्रण आहे आणि या समुदायाला धरण बांधण्याच्या कामासाठी एका प्रतिकूल समुदायामध्ये पुनर्स्थापित करण्यात आलेले आहे. मानव आणि निसर्गातील नातेसंबंधांच्या इतिहासाचे हे निवेदन असूनस्व-रक्षणासाठी मानवाने निसर्गाशी केलेल्या संघर्षाचा हा वास्तववादी इतिहास आहे. या कादंबरीतील नायकदेवप्पाचा वेदनादायी शोध मानवाच्या निसर्गाशी असलेल्या नात्यातील दृढता आणि संघर्ष रेखाटतो. मानवाच्या वर्तणुकीमुळे आणि ताकदीमुळे कशी पर्यावरणीय आणि सामाजिक हानी झालेली आहे याचे अत्यंत महत्वपूर्ण विधान या कादंबरीत करण्यात आलेले आहे. भारतीय कादंबरी प्रकाराला मराठीतील 'रिंगाणहे महत्वपूर्ण योगदान आहे. माणूस आणि पाळीव प्राणी यांच्यातील संबंधांचा एक अनोखा अनुबंध या कादंबरीतून अनुभवायला मिळतो.

कोंकणी भाषेतील वर्सलया लघुकथा संग्रहासाठी प्रकाश एस. पर्येंकर यांना पुरस्कार

            प्रख्यात कोंकणी लेखककवीअनुवादक तथा पटकथा लेखकप्रकाश एस. पर्येंकर यांना वर्सल’ या लघुकथा संग्रहासाठी प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.

70 वर्षे पूर्ण झाल्याने साहित्य अकादमीकडून 11-16 मार्च दरम्यान साहित्य महोत्सव आयोजित

            नॅशनल अकादमी ऑफ लेटर्सइंडिया या साहित्य अकादमीला यावर्षी ७० वर्षे पूर्ण होत असल्यानेसहा दिवसांचा सोहळा अकादमीकडून आयोजित करण्यात आला आहे. अकादमीतर्फे दरवर्षी साजरा केला जाणारा 'साहित्योत्सवया वेळी जगातील सर्वात मोठा साहित्य महोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवासराव यांनी माहिती दिली की190 हून अधिक सत्रांमध्ये 1100 हून अधिक नामवंत लेखक आणि अभ्यासक सहभागी होत असूनदेशातील 175 हून अधिक भाषांचेही त्यात प्रतिनिधित्व केले गेले आहे.

            प्रसिद्ध उर्दू लेखक आणि गीतकार गुलजार यांचे प्रतिष्ठित संवत्सर व्याख्यान 13 मार्च रोजी मेघदूत खुले नाट्यगृहात सायंकाळी 6.30 वाजता होणार.

            11 मार्च रोजी साहित्य अकादमी फेलोचेंही सत्कार करण्यात आले. बहुभाषिक काव्यवाचन आणि लघुकथा वाचनयुवा साहित्यअस्मितापूर्वोत्तरीभारतातील भक्ती साहित्यभारतातील बालसाहित्यभारताची कल्पनामातृभाषेचे महत्त्वआदिवासी कवी आणि लेखक संमेलन या विषयावर पॅनेल चर्चाया नियमित कार्यक्रमांव्यतिरिक्तभविष्यातील कादंबरीसांस्कृतिक अभिव्यक्ती म्हणून रंगभूमीभारताचा सांस्कृतिक वारसाभारतीय भाषांमधील विज्ञान कथानीतिशास्त्र आणि साहित्यभारतीय भाषांमधील चरित्रेसाहित्य आणि सामाजिक चळवळीपरदेशातील भारतीय साहित्य अशा विविध विषयांवर पॅनेल चर्चा आणि परिसंवादही होतील. या सहा दिवसीय महोत्सवात सहभागी होणारे हिंदी आणि विविध भारतीय भाषांमधील काही नामवंत लेखक आणि अभ्यासक असतील- एस.एल. भैरप्पाचंद्रशेखर कंबारपॉल जकारियाआबिद सुर्तीके. सच्चिदानंदनचित्रा मुदगलमृदुला गर्गके. एनोकममंग दाईएच.एस. शिवप्रकाशसचिन केतकरनमिता गोखलेकुल सैकियावाय.डी. थोंगचीमालश्री लालकपिल कपूरअरुंधती सुब्रमण्यमरक्षंदा जलीलराणा नायरवर्षा दाससुधा शेषयानउदय नारायण सिंगअरुण खोपकरशीन काफ निजाम आदी सहभागी होतील.

            तीन राज्यांचे राज्यपाल - आरिफ मोहम्मद खान (केरळ)श्री विश्वभूषण हरिचंदन (छत्तीसगड)आणि श्री सी.व्ही. आनंद बोस (पश्चिम बंगाल) हे देखील महोत्सवात सहभागी होण्याबाबतची माहिती अकादमी सचिवांनी दिली.

*******

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi