*अक्कलकोट वटवृक्ष स्वामी सेवा संचलित वैजयंती माळेची बुकिंग सुरू आहे.*
*📲 संपर्क: 9821583485*
*कृपया हि पोस्ट सगळीकडे शेअर करावी जेणेकरून सगळ्यांना या माळेचा उपयोग व्हायला हवा.*
#वैजयंती_माळ_महत्व#
भगवान श्रीकृष्ण एक खास प्रकराची माळ नेहमी धारण करतात, ती माळ असते वैजयंतीची. शास्त्रानुसार श्रीकृष्णाला 6 गोष्टी विशेष प्रिय आहेत. गाय, बासरी, मोरपंख, लोणी, खडीसाखर आणि वैजयंती माळ. मान्यतेनुसार ही माळ धारण केल्याने आकर्षण वाढते. येथे जाणून घ्या, वैजयंती माळेशी संबधित काही खास गोष्टी.
वैजयंती एक वृक्ष आहे. या झाडाची पाने थोडीशी लांब असतात. या झाडाला फांद्या नसतात. या झाडाला लागणारी फुले पिवळ्या किंवा लाल रंगाची असतात. हे फुल गुच्छ रूपात असतात. फुलांसोबतच छोटे-छोटे दाणे (बिया) असतात. हे दाणे खूप कडक असतात. या दाण्यांमध्ये छिद्र पाडून माळ तयार केली जाते.
वैजयंतीच्या झाडावर खूपच सुंदर फुल उमलतात. हे फुल खूप सुंदर आणि सुवासिक असतात. ह्यांचा बियाणांपासून माळ तयार केली जाते. वैजयंती माळ म्हणजे विजय किंवा जिंकवणारी माळ.
वैजयंतीचे फुल प्रभू श्रीविष्णू आणि देवी लक्ष्मीला फार आवडतात. श्रीकृष्णाला ही माळ फार प्रिय आहे. प्रभू श्रीकृष्ण आपल्या गळ्यात ही माळ नेहमीच घालत असतं.
असे म्हणतात की जेव्हा भगवान श्रीकृष्णाने पहिल्यांदा राधा आणि त्यांच्या मैत्रिणींसह रासलीला खेळली होती त्यावेळी राधाने त्यांना वैजयंतीची माळ घातली होती. वैजयंती एका प्रकारचा फुलांची वनस्पती आहे ज्यामध्ये लाल आणि पिवळे रंगाचे फुल येतात. या फुलांचे कडक दाणे कधीही तुटत नाही, सडत नाही नेहमीच चकचकीत असतात. ह्याचा अर्थ असा आहे की जो पर्यंत आयुष्य आहे तो पर्यंत असेच राहा. दुसरे असे की या माळेतील जे बियाणं आहे, ते बियाणं स्वतःला जमिनीशी जोडून वाढतो. याचा अर्थ असे आहे की आपण कितीही यशस्वी झाला तरी नेहमी जमिनीशी जुळलेले राहा.
अशी आख्यायिका आहे की श्री कृष्ण दोन कारणामुळे वैजयंतीची माळ घालत असे. पहिले कारण हे की वैजयंतीच्या माळे मध्ये सौंदर्य आणि माधुर्याची अधिष्ठात्री देवी लक्ष्मी वास्तव्यास असते. कारण भगवान श्रीकृष्ण यांचा मनात राधाचे पाऊल उमटलेले आहेत. म्हणून श्री लक्ष्मी यांनी वैजयंती माळेला आपल्या वास्तव्यास साठी निवडलेले आहे. जे नेहमी श्रीकृष्णाच्या वक्षस्थळी असते. आणि दुसरे कारण असे की श्रीकृष्णाला ही माळ सतत राधेची आठवण करून देत होती, ज्याला आधी मथुरेचा एक माळी आणत असतं.
काही विद्वान सांगतात की या वैजयंतीच्या माळेत पच प्रकारांचे मणी गुंफले जाते. जे पंचमहाभूतांचे प्रतीक आहे. या मणींचे नाव इन्द्रनीलमणि (पृथ्वी), मोती (जल), पद्मरागमणि (अग्नि), पुष्पराग (वायुतत्त्व) वज्रमणि म्हणजे हीरा (आकाश) आहेत.
#वैजयंती_माळेचे_महत्त्व : एका आख्यायिकेनुसार इंद्राने अभिमानास्तव वैजयंती माळेचा अवमान केला होता, त्या कारणास्तव महालक्ष्मी त्यांच्या वर रुसली होती परिणामास्तव त्यांना वणवण भटकावे लागले. देवराज इंद्र आपल्या हत्ती ऐरावत वर प्रवास करत होते. वाटेमध्ये त्यांना महर्षी दुर्वासा भेटले त्यांनी आपल्या गळ्यातली फुलांची माळ काढून इंद्रांना भेट स्वरूपात दिली. इंद्राने ह्याला आपला अपमान समजून ती माळ आपल्या हत्ती ऐरावतच्या गळ्यात घालून दिली, आणि ऐरावताने ती माळ आपल्या गळ्यातून काढून पाय खाली चिरडून दिली. आपल्या दिलेल्या भेटीचा असा अपमान होत असल्याचे बघून महर्षी दुर्वासाने संतापून इंद्राला लक्ष्मीहीन होण्याचे श्राप दिले.
वैजयंतीचे फायदे : वैजयंतीचे फूल आणि माळ खूप शुभ आणि पवित्र असतात. वैजयंतीचे फुलांचे अतिशय भाग्यवान असे झाड असतं. ह्याची माळ घातल्याने सौभाग्यामध्ये वाढ होते. या माळेला कोणत्याही सोमवारी किंवा शुक्रवारी गंगेच्या पाण्याने किंवा स्वच्छ पाण्याने धुऊन घालावी.
वैजयंतीच्या बियाणांची माळेने भगवान विष्णू किंवा सूर्याची पूजा केल्याने ग्रह नक्षत्रांचे प्रभाव नाहीसे होतात. विशेषतः शनीचा दोष नाहीसा होतो. ही माळ घातल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. ह्याला घातल्याने किंवा दररोज या माळेने आपल्या इष्ट देवांचे जप केल्याने नवी शक्तीचा संचार होऊन आत्मविश्वास वाढतो.
ही माळ घातल्याने मान सन्मानामध्ये वाढ होते. मानसिक शांती मिळते ज्यामुळे व्यक्ती आपल्या कार्याच्या क्षेत्रात मन लावून काम करते. अशी आख्यायिका आहे की पुष्य नक्षत्रामध्ये वैजयंतीच्या बियाणांची माळ घालणे खूप शुभ असतं. ही माळ सर्व प्रकारांच्या इच्छापूर्ण करते.श्री कृष्णास राधेने ही माळ भेट दिली होती म्हणुन श्री कृष्णास अत्यंत प्रिय आहे. पूजा, पाठ, मंत्रजप, यज्ञ, हवन या करिता तसेच गळ्यात धारण करण्या करीता या माळेचा उपयोग केला जातो. असे म्हटले जाते ही माळ धारण करणारा नारदमुनी प्रमाणे विद्वान श्रेष्ठ, इंद्रा प्रमाणे वस्त्र आभूषणे युक्त जगत्जेत्ता, श्री कृष्णा प्रमाणे सर्वांना मोहित करणारा व सर्वत्र यश प्राप्त करणारा बनतो. तसेच सर्व कार्यात यश प्राप्ती होते.
संपूर्ण फलप्राप्ती साठी शुक्ल पक्षातील पहिल्या शुक्रवारी ही सिद्ध केलेली माळ एका ताम्हणात घ्यावी. त्यावर कच्चे दूध अथवा गंगाजल शिंपडावे फुले व्हावीत अशी प्रतिष्ठापना करावी. श्री कृष्णाचे ध्यान करून
*'ॐ नमो भगवते वासुदेवाय'*
या मंत्राचा किमान १०८ वेळा जप करावा जप करत असताना एखादे पुष्प सतत गंगाजलात बुडवून माळेवर शिंपडत राहावे म्हणजे अभिषेक होईल. नंतर त्याच दिवशी अन्नदान करावे व नंतर ही माळ धारण करावी .
विवाहात अडचणी येत असतिल तर त्या व्यक्तीने सिद्ध केलेल्या वैजयंती माळेवर १०८ वेळा *ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः* या मंत्राचा जप करावा व केळ्याच्या झाडाचे पूजन करावे. लवकरच विवाह संपन्न होतो.
No comments:
Post a Comment