Wednesday, 27 September 2023

कांदळवन क्षेत्रात अतिक्रमण होणार नाही, यासाठी कडक पावले उचलावीत

 कांदळवन क्षेत्रात अतिक्रमण होणार नाही,

यासाठी कडक पावले उचलावीत

 मंत्री सुधीर मुनगंटीवार

कांदळवन संवर्धनाचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध प्रजातींचे उद्यान विकसित करणार

          मुंबईदि. 26 : केंद्र सरकारप्रमाणेच राज्य शासनही पर्यावरण संतुलन आणि संवर्धनासाठी आग्रही आहे. कांदळवनाचे संरक्षण आणि संवर्धन हे महत्वाचे आहे. कांदळवन क्षेत्रात अतिक्रमण होणार नाहीयासाठी कडक पावले उचलावीत. तसेच कांदळवनाचे महत्व विद्यार्थी आणि सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कांदळवनांच्या विविध प्रजातींचे उद्यान विकसित करावे. त्यातून जनजागृती करावी. लोप पावत चाललेल्या प्रजाती वाचवण्यासाठी संवर्धन प्रकल्प हाती घ्यावीअसे निर्देश आज वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

            महाराष्ट्र कांदळवन आणि जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाची बैठक वन मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार मनीषा चौधरीआमदार योगेश कदमवन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाळ रेड्डीमत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त अतुल पाटणेकांदळवन प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक एस. व्ही. रामारावसहसचिव (वित्त) विवेक दहिफळेउपवनसंरक्षक अनिता पाटीलविभागीय वन अधिकारी आदर्श रेड्डीमहाराष्ट्र सागरी मंडळाच्या पर्यावरण अभियंता ज्योती पाटीलसंचालक (पर्यावरण) अभय पिंपरकरसहआयुक्त (मत्स्य) युवराज चौगलेदांडा कोळी मासेमारी व्यावसायिक सहकारी संस्थेचे भिका कोळी याशिवायभारतीय तटरक्षक दलकोकण विभागीय आयुक्तांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे महाराष्ट्र वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकरबॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक आदी उपस्थित होते.

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीराज्यात एकूण 20 प्रजाती आहेत. आपल्या राज्यासह देशातील कांदळवन प्रजातींचे उद्यान आपल्या राज्यात असावे. याशिवायगोराईदहिसर येथील कांदळवन पार्कचे काम गतीने करावे. कांदळवनासाठी ऊतीसंवर्धन तंत्राचा वापर करुन त्याच्या जतनासाठी काय करता येईलयाबाबत बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या सहकार्याने संशोधन प्रकल्प हाती घ्यावाअशा सूचना त्यांनी दिल्या.

            कांदळवन संशोधनासाठी काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात अभ्यासासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यामध्ये अधिक सुलभता आणावी. खाऱ्या पाण्यातील मत्स्य पालनासाठी केंद्रीय खारेपाणी मत्स्यपालन संस्थाचेन्नई यांच्या प्रशिक्षित वर्गाकडून राज्यातील मत्स्य पालकांना राज्यातच प्रशिक्षण देता येईल, अशी व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देशही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिले.

            दलदलीच्या कांदळवन क्षेत्रात कांदळवन रोपवनाचे काम करणाऱ्या मजुरांवर आपत्ती ओढवल्यास त्यांना भरीव मदत द्यावी. कांदळवन क्षेत्रातील बदल तपासण्यासाठी एमआर सॅक यंत्रणेकडून अद्ययावत उपग्रह नकाशे प्राप्त करुन घेऊन कार्यवाही करावीबहुप्रजातीय मत्स्यबीज ऊबवणी केंद्रासाठी कांदळवन प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यवाही करावीअशा सूचनाही त्यांनी केल्या.

            केंद्र शासनाच्या मिश्टी प्रकल्प आणि अमृत धरोहर योजनेंतर्गत दोन प्रस्ताव पाठविले आहेत. त्याचा पाठपुरावा करावाअसे निर्देशही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिले. कांदळवन क्षेत्र वाढविण्यासाठी यंत्रणेने अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहेअसे त्यांनी सांगितले.

            यावेळी श्री. रामाराव यांनी कांदळवन प्रतिष्ठानमार्फत हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi