*🔸 ब्राम्हमुहूर्तावर उठल्याने होणारे लाभ*
ब्राम्हमुहूर्त रात्री २ ते ६ या वेळेत , म्हणजे वाताच्या काळात येतो आणि त्या वेळेत वात सर्वाधिक बलवान असतो. त्यामुळे या काळात उठल्यास मल-मुत्रांचे उत्सर्जन आपसुख होते; कारण उत्सर्जनासाठी गती आवश्यक असते आणि ती वातामुळेच प्राप्त होते. ब्राम्हमुहूर्त हा ऋषींच्या साधनेचा काळ आहे. त्यामुळे या काळात उठल्यास वातावरणातील सात्विकतेचाही लाभ होतो.
🔸 उशिरा उठण्याने होणारी हानी
ब्राम्हमुहूर्तानंतर कफाचा काळ चालू होतो. कफ गतिमान अशा वाताच्या विरुद्ध गुणधर्माचा, म्हणजे स्थिर आहे. उशिरा उठल्यामुळे मल-मुत्रांचे उत्सर्जन होण्यास वाताची गती मिळत नाही. मग ही गती निर्माण करण्यासाठी चहा ,कॉफी किंवा गरम पाणी प्यावे लागते. यामुळे पुन्हा अजीर्ण ( अपचन ) होते. मलाचे योग्य रीतीने उत्सर्जन न झाल्याने अग्नीवर परिणाम होतो. यामुळे आरोग्य बिघडते. उशिरा उठणे आणि दिवसभर झोपणे या कारणांमुळे अनेक लठ्ठ व्यक्तींना वजन न्यून होण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करूनही यश येत नाही.
No comments:
Post a Comment