Wednesday, 15 March 2023

आदिवासींना जमिनींचा मोबदला देतांनाहोणारी फसवणूक टाळण्यासाठी कँम्प घेवून वितरण

 आदिवासींना जमिनींचा मोबदला देतांनाहोणारी फसवणूक टाळण्यासाठी कँम्प घेवून वितरण


- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील


            मुंबई, दि. १४ : मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, वसई, पालघर व वाडा या पाच तालुक्यातील ७१ गावांमधून जात असून यासाठी भुसंपादन प्रक्रिया सुरू आहे. या ७१ गावांमध्ये आदिवासींच्या जमिनी असून त्यांना मोबदला देतांना आदिवासींची होत असलेली फसवणूक टाळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यासाठी शासकीय स्तरावर कँम्प घेण्यात येवून त्यांच्या मोबदला आणि इतर कागदपत्रे त्यांना वितरित करण्यात येतील असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.


            याबाबत विधानसभा सदस्य विनोद निकोले यांनी लक्षवेधी सूचना मांडणी होती.


            महसूल मंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले, आदिवासी बांधवांची फसवणूक होत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. यासर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह एक बैठक बोलविण्यात येऊन आदिवासी बांधवांना येणाऱ्या अडचणी समजून घेवून त्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. नियमांचे उल्लंघन झाले असेल तर चौकशी करण्यासाठी आवश्यकता असल्यास एस आय टी मार्फत चौकशी करण्यात येईल. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.


            या चर्चेत विधानसभा सदस्य नाना पटोले, मनिषा चौधरी यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi