Thursday, 23 March 2023

कडु निंब**

 🌾** कडु निंब**🌾


     ,, हिंदूंचे नविन वर्ष हे,, गुढिपाडव्या,, पासून सुरू होते. चैत्र महिन्यात झाडांना नविन पालवी फुटते आणि उन्हाच्या कडाका जाणवतो. शरिरात उष्णता निर्माण होते, नाना आजार होतात. 

     तेव्हा अश्या आजारांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून , प्रतिकारशक्ति वाढावि, म्हणून, आपले नविन वर्ष , आरोग्यपूर्ण जावे म्हणून आपल्या पूर्वजांनि पाडव्याला,, कडुनिंबाचे महत्व सांगितले आहे.

       यादिवशि आंघोळिच्या पाण्यात डहाळि टाकून स्नान करतात.( कडुनिंबाचि पाने, मीठ, जीरे, हिंग, ओवा, चिंच गूळ घालून चटणि सेवन करावे.) ती पाने खाउनच दिवसाचि सुरवात करतात. मग बघू या तर इतरहि फायदेः.. अंगात मुरलेलि उष्णता, कडकि कमि करते, रोगप्रतिकार शक्ति वाढवते,

      🌾 गोवर, कांजण्या, घामोळ्या, डोळे येणे , यावर गुणकारि आहे. आवळ्याचे चूर्ण व नीमपत्ति एकत्र करून खाल्ल्यास पित्त कमि होते,( जखमा भरून काढण्यासाठी नीमपत्तिचा लेप लावतात, दारूहळद व ज्येष्ठमध एकत्र करून)..

      रक्तशुद्धिकरता ५/६ पाने चावून खावित सकाळी, याच्या काड्यांनि दात घासल्यास दातातलि किड मरते,, तोंडाचे सर्व विकार बरे होतात. मधूमेह असणार्यांनि कडुनिंबांच्या पंचांगांचा काढा करून प्यावा. नीम तेलाने मालिश केल्यास ,सांधेदूखि कमि होते.

    🌾 त्वते संबंधि सर्व प्रकारच्या विकारांवर गुणकारि.

 चेहर्यावरचे डाग, मुरूमे, पुरळ, लेप लावल्यास जातात.

 कफ, खोकलि, दमा, यांवर खुप लाभदायक. शरिरातिल पि. एच. चा स्तर नियंत्रणांत ठेऊन अल्सरवर मात करता येते. शर्करा नियंत्रित राहते, हे इंसूलिनचे काम करीत असते.

     🌾. कडूनिंबाचि पाने उकळुन थंड करून चेहरा धुवावा, स्वच्छ होतो, कांति नितळ होते. मलेरियाचे डास भटकत नाहि. जिथे कडुनिंबाचे झाड असते,

  केसांना खुप पोषक आहे . ,, लेप लावल्यास काळे राहतात, गळत नाहि, कोंडा होत नाही..

    कानात रस टाकल्यास कर्णविकार सर्व बरे होतात.

 नीम तेलाचे ५,६ थेंब रात्रि झोपतांना दुधातून घेतल्यास घाम येणे, जळजळ, होणे,पोटात, हे बंद होते. 

  🌾 निंबोणिचे चूर्ण बनवून १, २ ग्रँम घेतल्यास अपचन होत नाही, आतडि मजबुत होतात. उन्हाळ्यात उष्माघात झाल्यास , कडूनिंबाचे पंचांग, ( पाने, फुले, फळे, साल, मूळ) याचे चूर्ण घ्यावे.

     विंचवाच्या दंशावर गुणकारि आहे. विषाचा प्रभाव कमी होतो.. ताप कमि होतो, निमरसामूळे, परदेशात देखील एडस्, कँसर, अश्या आजारावर बरे होण्याची औषधे तयार होत आहे.महिन्यातील दहा दिवस निमरस घेतल्यास ,,ह्रुदयरोग बरा होतो,, याच्या रसामूळे मंदाग्नि होत नाही, पचन क्रिया बरि होते. कफदोष, पित्तदोष, बरे होतात..


          आयुर्वेद अभ्यासक..... सुनिता सहस्रबुद्धे...

   🌾 तर असा हा कडूनिंब म्हणजे एक दवाखाना च आहे असे म्हटले तरि चा लेल...🌾🌾🌾...


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*





No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi