नवीन 750 एकर च्या औद्योगिक वसाहतीची जागा निश्चिती लवकरचविभागीय कार्यालय, हॉस्पिटलसाठी जागा लवकरच
व्यापार मित्र समितीची स्थापना होणार
मुंबई ः जळगांव जिल्ह्यातील नवीन उद्योगांची गरज पुर्ण करण्यासाठी कुसुंबा जवळ 750 एकर जागेत नवीन औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी सह मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी येत्या आठवड्यात जागा पाहणी करून अहवाल सादर करतील, तसेच एमआयडीसी चे स्वतंत्र विभागीय कार्यालय जळगांव येथे सुरू करण्यात येणार असून, कामगार विमा योजनेच्या हॉस्पिटलसाठी आवश्यक 5 एकर जागा एक महिन्या निश्चित केली जाईल असे निर्णय गुरूवार दि. 9 रोजी मुंबई येथे उद्योग विभागात संपन्न बैठकीत झाल्याची माहीती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या एक्सप्रेस टॉवर येथील कार्यालयात संपन्न बैठकीत उद्योगमंत्री ऑनलाईन सहभागी झाले. आमदार सुरेश भोळे व महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, सहसचिव उद्योग संजय देगांवकर, अवर सचिव उद्योग किरण जाधव, MIDC उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सोनाली मुळे, MIDC मुख्य अभियंता एस.आर.तुपे, प्रादेशिक अधिकारी अनिल गावित, जळगांव जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आमदार सुरेश भोळे यांनी उद्योजकांचे प्रश्न तातडीने निकाली निघावेत व यात कुचराई करण्यार्या अधिकार्यांवर कारवाई व्हावी अशी आग्रही मागणी केली.
औद्योगिक व व्यापारी संघटनांच्या वतीने महाराष्ट्र चेंबरच्या जळगांव जिल्हा विकास परिषदेच्या संयोजिका संगीता पाटील, तसेच महेंद्र रायसोनी, नितिन इंगळे, किरण बच्छाव, अरविंद दहाड, दिलीप गांधी, किरण राने, सचिन चोरडीया, सुयोग जैन, रूपेश शिंदे, राजेंद्र चौधरी, महेंद्र सोनार, रमेश शिंदे, संजय जैन यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेऊन विविध प्रश्न मांडले.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी जळगांव शहरातील व्यापारी-उद्योजकांचे प्रश्न मांडून याविषयी सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली तसेच, चोपडा, भुसावळ, भडगांव येथील औद्योगिक वसाहतींच्या पायाभुत सुविधांसाठी निधि देण्याची मागणी केली.
एमआयडीसी क्षेत्रातील फायर स्टेशन सुरू करण्याची मागणी केली असता महापालीकेतर्फे हे फायर स्टेशन सुरू करण्याची तयारी दर्शविण्यात आली.
दृकश्राव्य प्रणालीद्वारे सहभागी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी उद्योग मित्र समितीच्या बैठका नियमित घेतल्या जातील असे सांगुन, कामगार विमा योजना हॉस्पिटलसाठी जागेचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याची ग्वाही दिली.
व्यापार्यांचे विविध विभागांशी संबंधित स्थानिक प्रश्न लवकर निकाली निघण्यासाठी ‘उद्योग मित्र समिती’ च्या धर्तीवर ‘व्यापार मित्र समिती’ नेमण्याची मागणी ललित गांधी यांनी केली त्यास मान्यता देण्यात आली.
दुकानगाळ्यांच्या भाड्याचा प्रश्न, दुहेरी कर आकारणी व अन्य धोरणात्मक बाबींवर निर्णय घेण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय ही यावेळी घेण्यात आला.
आमदार सुरेश भोळे यांनी जळगांवला नवीन मोठा उद्योग प्रकल्प येण्यासाठी उद्योग विभागाने विशेष प्रयत्न करावेत अशी मागणी केली. जळगांव जिल्हा विकास परिषदेच्या संयोजिका सौ. संगिता पाटील यांनी जळगांव जिल्ह्याचा अपेक्षित विकास झाला नाही. आता जळगांव जिल्हाला विशेष प्राधान्य द्यावे अशी मागणी केली.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी यावेळी विमानसेवा, पायाभुत सुविधा, एपीएमसी कायदा, प्रोमोशनल टॅक्स यासंबंधीच्या मागण्याही सादर केल्या.
आजच्या बैठकीतील चर्चा व कार्यवाहीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षेखाली पंधरा दिवसात पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय ही यावेळी घेण्यात आला.
फोटो कॅप्शन ः उद्योग विभागात संपन्न बैठकीमध्ये व्यापार-उद्योगाच्या प्रमुख मागण्याविषयी चर्चा करताना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी चर्चेत सहभागी आमदार सुरेश भोळे, एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, सहसचिव उद्योग संजय देगांवकर, अवर सचिव उद्योग किरण जाधव, MIDC उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सोनाली मुळे, MIDC मुख्य अभियंता एस.आर.तुपे, प्रादेशिक अधिकारी अनिल गावित, जळगांव जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील, सौ. संगिता पाटील, महेंद्र रायसोनी, नितिन इंगळे, किरण बच्छाव, अरविंद दहाड, दिलीप गांधी, किरण राने, सचिन चोरडीया, सुयोग जैन, रूपेश शिंदे, राजेंद्र चौधरी, महेंद्र सोनार, रमेश शिंदे, संजय जैन
No comments:
Post a Comment