Wednesday, 8 February 2023

राज्यस्तरीय कामगार साहित्य संमेलनाचे २४ व २५ फेब्रुवारी रोजी मिरज येथे आयोजन

 राज्यस्तरीय कामगार साहित्य संमेलनाचे

२४ व २५ फेब्रुवारी रोजी मिरज येथे आयोजन

कामगार मंत्री डॉ. सुरेश  खाडे

                                                                        

            मुंबईदि. ८ :- सतराव्या राज्यस्तरीय कामगार साहित्य संमेलनाचे आयोजन  दि.२४ व २५ फेब्रुवारी २०२३ रोजी मिरजजि. सांगली येथे करण्यात आले असून सर्व कामगारांनी या संमेलनात उस्फुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन कामगार मंत्री ना. डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केले. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री डॉ.खाडे यांनी संमेलनाबाबत माहिती दिली.

            बालगंधर्व नाट्य मंदिरमिरजजि.सांगली येथे हे  संमेलन होणार असून  शुक्रवारदि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. विभागामार्फत संमेलनासाठी इच्छुक कामगारांची नोंदणी करण्यात येत असून अधिक माहितासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेतस्थळास अथवा नजीकच्या कामगार कल्याण केंद्रास व कार्यलयास भेट द्यावीअसे आवाहन मंत्री डॉ.खाडे यांनी यावेळी केले.

            या दोन दिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्र विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्षा डॉ. राजा दीक्षित या संमेलनाचे उद्घाटक तर कामगार मंत्री ना. डॉ. सुरेश  खाडे स्वागताध्यक्ष असून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इलदे या संमेलनाचे प्रमुख कार्यवाह आहेत.

            डॉ.भवाळकर यांनी लोकसंस्कृती विषयी विपूल लेखन केले असून मराठी विश्वकोशमराठी ग्रंथकोश आदी महत्वाच्या कार्यात त्यांचे योगदान आहे. तसेच नाटककथासंग्रहवैचारिकललित लेखनसमीक्षात्मक अशा विविध प्रकारची साहित्य निर्मिती त्यांनी केलेली आहे.

            संमेलनाच्या पहिल्या सत्रात 'चला उद्योजक होऊ या विषयावर डॉ विठ्ठल कामत (कामत हॉटेल्स गृप लि.)गिरीश चितळे (चितळे उद्योग समुह)हनुमंतराव गायकवाड (भारत विकास गृप इंडिया लि.) या उद्योजकांची प्रकट मुलाखत होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात कामगार चळवळीची कथा आणि व्यथा', 'मराठी साहित्यात कामगार जिवनाचे चित्र शोधताना', 'आम्ही का लिहितो ?', 'व्यसनमुक्तीची लढाई या विषयांवर परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर कवींचे कवी संमेलन आणि काव्य मैफिलीचा रसिक प्रक्षेकांना आस्वाद घेता येणार आहे. निमंत्रित तसेच कामगार कवींचा कवी संमेलनात सहभाग असेल. संमेलनात कथाकथनाचे सादरीकरण होणार असून अभिरुप न्यायालय देखील भरवले जाणार आहे. आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार अभिरुप न्यायालय कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi