महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीची पुनर्रचना करण्याबाबत
१६ जानेवारी २०२३ रोजी काढलेल्या शासन निर्णयाबाबत
पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने केलेले स्पष्टीकरण
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या १६ जानेवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयात हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा उल्लेख झालेला होता. सदरचा उल्लेख यापूर्वीच्या शासन निर्णयांमध्ये असल्याने त्याची पुनरावृत्ती अनवधानाने या शासन निर्णयामध्येही झालेली होती. आता सदर शासन निर्णयामध्ये आवश्यक तो बदल करून शुद्धिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे, असे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने स्पष्ट केले आहे.
००००
No comments:
Post a Comment