पर्यावरणाचा समतोल राखून त्रंब्यकेश्वरचा विकास करणार
-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नागपूर, दि. 27 : “पर्यावरणाचा समतोल राखून त्रंब्यकेश्वरचा विकास केला जाईल,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान सभेत एका लक्षवेधीला उत्तर देतांना सांगितले.
“नाशिक जिल्ह्यातील त्रंब्यकेश्वर येथील पाण्याची मागणी वाढली आहे. या वाढीव पाण्याच्या मंजूरीसाठी तसेच इतर सोयी सुविधांसाठी लवकरच जिल्हाधिकारी आणि संबधित यंत्रणांच्या सोबत बैठक घेतली जाईल असे” उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लक्षवेधीच्या एका उपप्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.
सदस्य हिरामण खोसकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षावेधीवरील चर्चेत छगन भुजबळ यांनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment