Sunday, 30 October 2022

म्हणून पाया पडायची पध्दत

 *म्हणून पाया पडायची पध्दत आहे...*


चागंली पध्दत‌आहे, पण कलियुगात वाईट घडते?


●● *नमस्काराचे महत्व* ●●


● *महाभारताचे युद्ध सुरु होते.* 

   *दररोज कौरवसेनेचे  मोठमोठे योद्धे*

   *मारले जात होते. पितामह भिष्मांसारखे*

   *ज्येष्ठ योद्धे कौरवांच्या बाजूने असून* 

   *देखील त्यांच्या सेनेची सतत हानी* 

   *होत होती..*


● *एक दिवस दुर्योधन वैतागून पितामहांवर* 

   *व्यंग करतो. त्यामुळे व्यथित होऊन* 

   *भीष्म पितामह घोषणा करतात की..*


● *"मी उद्या सर्व पांडवांचा वध करेन.."*


● *त्यांच्या घोषणेची बातमी पांडवांच्या* 

   *शिबिरात पोहोचताच पांडवांची* 

   *अस्वस्थता वाढली कारण भीष्मांच्या* 

   *क्षमते बाबत सर्वांनाच कल्पना होती..*


● *तेवढ्यात श्रीकृष्ण शिबिरात दाखल* 

   *झाले. पांडवांची अस्वस्थता त्यांच्या* 

   *लक्षात येताच ते द्रौपदीला म्हणाले..* 


● *"माझ्या सोबत चल.."*


● *द्रौपदीला सोबत घेऊन श्रीकृष्ण* 

   *पितामहांच्या कक्षात पोहोचले.* 

   *ती वेळ रात्रीची होती. स्वतः बाहेर* 

   *उभे राहून ते द्रौपदीला म्हणाले की,* 

   *आत जाऊन पितामहांना प्रणाम कर..*

 

● *सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने आत* 

   *जाऊन पितामहांना प्रणाम करताच,* 

   *"अखंड सौभाग्यवती भव" असा* 

   *आशीर्वाद त्यांनी तिला दिला..*


● *त्यानंतर त्यांनी द्रौपदीला विचारले की,* 

   *"वत्स, एवढ्या रात्री तू एकटी कशी* 

   *काय आलीस..??"* 


● *"माझे बंधू श्रीकृष्णासोबत मी इथे*

   *आले आहे आणि ते बाहेर थांबले* 

   *आहेत" असे द्रौपदीने सांगताच* 

   *श्रीकृष्णाला भेटायला पितामह* 

   *बाहेर आले आणि त्या दोघांनी* 

   *एकमेकांना प्रणाम केला..*


● *भीष्म पितामह म्हणाले..*

   *"माझ्या एका वचनाला दुसऱ्या* 

   *वचनाने मात देण्याचे काम फक्त*

   *श्रीकृष्णच करु शकतात.."*

 

● *शिबिरात परतताना श्रीकृष्ण* 

   *द्रौपदीला म्हणाले की, "बघ,* 

   *तुझ्या फक्त एक वेळ जाऊन* 

   *पितामहांना नमस्कार करण्यामुळे*

   *तुझ्या पतींना जीवनदान मिळाले,* 

   *हे तुझ्या लक्षात आले का..??*


● *जर तू दररोज नित्यनेमाने पितामह* 

   *भीष्म, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य ह्या* 

   *मान्यवरांना नमस्कार केला असतास* 

   *आणि दुर्योधन, दु:शासन ह्यांच्या* 

   *पत्नींनी जर नित्यनेमाने ज्येष्ठ बंधू* 

   *पांडवांना नमस्कार केला असता तर* 

   *हि युद्धाची वेळच आली नसती..*


● *अशी असते नमस्कार* 

   *आणि आशीर्वादाची शक्ती..!!*


●● *तात्पर्य..*


● *वर्तमानकाळात आपल्या घरी ज्या समस्या आहेत, त्यांचे मूळ कारण हेच आहे की,*


*कळत नकळत आपल्या हातून वडिलधाऱ्या मंडळीची उपेक्षा केली जाते..*


● *जर प्रत्येक घरात वडिलधाऱ्या मंडळीना दररोज नमस्कार करुन त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील, तर त्या घराघरात वितंडवाद सहज टाळता येऊ शकतात..*

   *असे घर स्वर्ग बनू शकते..*


● *मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे*

   *कवच आहे की, ज्याला कुठलेही शस्त्र भेदू शकत नाही..* 

 

● *कारण..*


● *नमस्कारात प्रेम आहे..*

   *नमस्कारात विनय आहे..*

   *नमस्कारात अनुशासन आहे..*

   *नमस्कार आदर शिकवतो..*

   *नमस्कारामुळे मनात सुविचार येतात..* 

   *नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो..* 

   *नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो..* 

   *नमस्कारात शीतलता आहे..*              

   *नमस्कार अश्रू पुसण्याचे काम करतो..*

   *नमस्कार आपली संस्कृती आहे..*

   *ह्या संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे..*


*🙏 आपणास माझा साष्टांग नमस्कार !! 🙏*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi