स्वराज - भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सर्वसमावेशक कथा'‘दूरचित्रवाणी’ वर रविवारपासून प्रसारीत
नवी दिल्ली, दि. 13 : ‘स्वराज - भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सर्वसमावेशक कथा’ ही मालिका दूरचित्रवाणीवर दर रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत प्रसारित होणार आहे. या मालिकेचा पहिला भाग उद्या 14 ऑगस्ट 2022 प्रसारित होणार आहे.
'स्वराज - द होल स्टोरी ऑफ इंडियाज फ्रीडम स्ट्रगल' ही एक मेगा ऐतिहासिक लघुपट मालिका आहे. 15 व्या शतकापासून ते 20 व्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा निर्भीड, गौरवशाली इतिहास दूरदर्शनच्या माध्यमातून दाखविला जाईल.
ही मालिका केवळ इंग्रजांनी केलेल्या अन्यायावर नसून तर डच, फ्रेंच, पोर्तुगीज वसाहतवाद्यांच्या विरोधात आवाज उठविलेल्या 75 ज्ञात - अज्ञात स्वातंत्र्यवीरांच्या जीवनावर आधारित आहे. या मालिकेत राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज, तात्या टोपे, मॅडम भिकाजी कामा, गणेश सावरकर, विनायक दामोदर सावरकर, नाना साहेब, बाजीराव पेशवे, तसेच राणी आबक्का, बक्षी जगबंधू, तिरोत सिंग, सिद्धो कांथो मुर्मू तसेच शिवाप्पा नायक, कान्होजी आंग्रे, राणी गैदिनलिऊ, तिलका मांझी यांसारख्या स्वातंत्र्यावीरांच्या गाथांचा समावेश असणार आहे.
चित्रपट अभिनेता मनोज जोशी यांनी या मालिकेत सूत्रधाराची भूमिका बजावली आहे.
‘स्वराज - भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सर्वसमावेशक कथा’ 20 ऑगस्टपासून मराठीत प्रसारित
20 ऑगस्टपासून सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवरुन ‘स्वराज - भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सर्वसमावेशक कथा ’ही मालिका मराठीत प्रसारित होणार आहे. मराठीसह इंग्रजी , तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, गुजराती, बंगाली, उडिया आणि आसामी अशा 8 प्रादेशिक भाषांमध्येही 20 ऑगस्टपासून रात्री 8 ते 9 वा. यावेळेत प्रसारित केली जाईल.
000
No comments:
Post a Comment