सीएमआयए वतीने एमआयडीसी अधिकार्यांसमवेत उद्योग संघटना प्रतिनिधींची बैठक
• औद्योगिक वसाहतीमधील पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी कटिबद्ध: एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी राजेंद्र जोशी
• चिकलठाणा वसाहतीसाठी नवीन पाईपलाईनचे काम मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करणार: कार्यकारी अभियंता आर. डी. गिरी
औरंगाबाद : एमआयडीसी अधिकारी आणि उद्योग/उद्योग संघटना प्रतिनिधींची बैठक सोमवार, दि.२२ ऑगस्ट २०२२ रोजी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (सीएमआयए) येथे आयोजित करण्यात आली होती. एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी श्री राजेंद्र जोशी आणि कार्यकारी अभियंता आर. डी. गिरी यांनी स्थानिक उद्योजकांशी संवाद साधला. वाळूज, रेल्वे स्थानक, चिकलठाणा, शेंद्रा औद्योगिक क्षेत्रातील सीएमआयए सदस्यांनी उद्योगविषयक विविध समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या यात प्रामुख्याने पायाभूत सुविधांचा विकास, प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सेवा, पाणी पुरवठा, ट्रक तर्मिनाल्ची गरज, मोठ्या वाहनांची पार्किंग आणि त्यातून उद्भवणाऱ्या वाहतूक समस्या, उद्योग वसाहतीमधील मुरूम चोरी आणि इतर गुन्हे आदी विषयाचा समावेश होता. यावेळेस बोलतांना एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी राजेंद्र जोशी, कार्यकारी अभियंता गिरी यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे देतांना एमआयडीसी कार्यायाकडून करण्यात येणाऱ्या उपाय योजना या बाबत सविस्तर मांडणी केली. याप्रसंगी बोलतांना सीएमआयएचे माजी अध्यक्ष कमलेश धूत यांनी या बैठकी मागची संस्थेची भूमिका मांडली तसेच आगामी काळात अधिकारी आणि उद्योजक यांच्यामध्ये दुवा बनण्याचे काम संस्था करेल अशी माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमात बोलतांना प्रादेशिक अधिकारी राजेंद्र जोशी म्हणाले एमआयडीसी कार्यायाकडून कोरोन नंतरच्या काळात औद्योगिक वसाहतीमध्ये रस्ते, स्टोर्म वॉटर डक्ट, ड्रेनेज आणि इतर पायाभूत सुविधाच्या विकासाकरिता सुमारे ३२ कोटी खर्च करण्यात आले, आगामी काळात ४२ कोटीचे काम हाती घेण्यात आले असून यामध्ये प्रमुख रस्त्यांचे मजबुतीकरण, लिंक रोड विस्तारीकरण, आणि पावसाचे पाणी साचू नये याकरिता व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. वाळूज येथे कार्बन तंत्रज्ञानावर आधारित त्रिटमेंट प्लांट विकसित करून त्यामधून 5 MLD पाण्याचा पुनर्वापर करण्याकरिता शुद्धीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चिकलठाणा वसाहतीसाठी नवीन पाईपलाईन
चिकलठाणा औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा करणारी जल वाहुनीला ३0-३५ वर्षे झाली असून अनेक ठिकाणी ती जीर्ण झाली आहे. यामुळे उपसा क्षमता ५०% पर्यंत कमी झाली. मागील काळात एकीकडे उद्योगाला कमी पाणी उपलब्ध असतांना मानवतेच्या दृष्टिकोनामधून मान्पाकरिता २-३ एमएलडी पाणी देण्यात आले. यावरउपाय म्हणून वाहन क्षमता कमी झालेली जलवाहिनी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मार्च २०२३ पर्यंत हे काम पूर्ण होईल अशी माहिती एमआयडीसी कार्यकारी अभियंता आर. डी. गिरी यांनी दिली. एकूण 22 किमी लांबीची नवीन पाईपलाईनटाकण्यात येईलयापैकी १५किमी लाम्बिंचे पाईपउपलब्ध झाले असून, ६ किमी लांबीचे पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.
जळगाव एमआयडीसी धर्तीवर सेवा
याप्रसंगी प्रश्न मांडतांना चिकलठाणा वसाहती मधील उद्योजकांनी एमआयडीसी आणि मनपा यांच्याकडे सेवा विखुरल्या गेल्या असल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे मत व्यक्त केले. यावर बोलतांना एमआयडीसी अधिकाऱ्यांनी ही वषात मनपाकडे हस्तांतरित केली असल्यामुळे पाण्याव्यतिरिक्त इतर सेवा मनपाच्या वतीने पुरवण्यात येत असल्याचे सांगितले. जर उद्योजकांची तयारी असेल तर सेवा हस्तांतरित करण्यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला पत्र द्यावे, जळगाव एमआयडीसीच्या धर्तीवर सेवा देता येऊ शकतील असे मत व्यक्त केले.
सीएमआयएच्या वतीने घेण्यात येणाऱ्या या समन्वयक बैठीकीबद्दल एमआयडीसी अधिकाऱ्यांनी संस्थेचे आभार मांडले. या वेळेस सीएमआयएतर्फे एमआयडीसी संस्थेने ६० वर्षे पूर्ण केल्याबद्दल अधिकार्यांचा विशेस सत्कार केला. याप्रसंगी माजी अध्यक्ष कमलेश धूत, दीपक तोष्णीवाल आणि इतर सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती
Photo 1 : डावीकडून एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी राजेद्र जोशी, कार्यकारी अभियंत आर. डी. गिरी, उद्योजक कमलेश धूत
Photo 2: उपस्थित उद्योजक सदस्य
Photo 2: उपस्थित उद्योजक सदस्य


No comments:
Post a Comment