Sunday, 21 August 2022

कौशल्य विकास

 उद्धर ग्रामस्थांच्या कौशल्याला वाव देणार

आमदार अतुल भातखळकर यांचा विश्वास

मुंबई, दि. 18 ऑगस्ट (प्रतिनिधी)

          खोपोली परिसरातील उद्धर गाव आणि परिसरातील खेड्या, पाड्यातील ग्रामस्थांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी कौशल्य विकास योजनेतून प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार अतुल भातखळकर यांनी दिली. उद्धर येथे आ. भातखळकर यांच्या हस्ते परिसरातील पाच गावांमधील ग्रामस्थांना प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती देण्यात आल्या. स्व. शैलजा दत्तात्रय भातखळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. भातखळकर म्हणाले, उद्धर आणि परिसरातील गावांमधील ग्रामस्थांमध्ये असलेल्या कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळाले पाहिजे. त्यांच्याकडील विविध क्षेत्रात असलेले कौशल्य सर्वांपुढे आले पाहिजे, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार आहे. भविषयातही या परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवून ग्रामस्थांना जास्तीत जास्त मदत करू. यावेळी उद्धर आणि परिसरातील पाच गावातील ग्रामस्थांना प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती देण्यात आल्या. यावेळी हरी शेट्टी, प्रदीप लांगी, घोसाळकर, पाटील यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.      

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi