Friday, 29 April 2022

अप्रतिम संदेश

 *राजाच्या चार राण्या* 

पहिली राणी इतकी सुंदर होती, कि *तो तिला प्रेमाने बघतच रहायचा*.

❕दुसरी राणी इतकी सुंदर होती की, *तिला तो सतत बरोबर ठेवायचा*

❕तिसरी राणी इतकी सुंदर होती कि, *तिला कायम बरोबर घेऊन फिरायचा* .

❕पण *चौथ्या राणीकडे तो कधीच* लक्ष द्यायचा नाही !!!

❕राजा म्हातारा झाला, *तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला* बोलावले आणि म्हणाला,

 *मी तुला एवढे प्रेम दिले, तू माझ्याबरोबर* येशील का?"

❕राणी म्हणाली "नाही, *मी तुम्हाला इथेच सोडून* देणार आहे."

❕राजाला दुखः झाले. मग त्याने दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला राणी म्हणाली,

 "मी *तुमच्याबरोबर स्मशानापर्यंत येईन*. त्यापुढे नाही.

❕राजाला अपार दुखः झालं, त्याने आशेने तिसऱ्या राणीला विचारले, 

"तू *तरी माझ्याबरोबर येशील का नाही* ?

❕तिसरी राणी म्हणाली, "नाही. *तुम्ही गेल्याबरोबर मी दुसऱ्या बरोबर* जाणार आहे," 

❕आता मात्र *राजाच्या दु:खाला पारावार राहिला नाही*. तो विचार करू लागला. मी या *राण्यांवर माझे पूर्ण जीवन घालवले*! त्या कधीही माझ्या नव्हत्याच ??

*माझे जीवन व्यर्थ* *घालवले, फुकट वेळ*, *पैसा, आयुष्य खर्च केले*.

❕तेवढ्यात राजाची *चौथी राणी तेथे आली*, जिच्याकडे राजाने कधीच लक्ष दिलं नव्हते? *तिच्या अंगावर दागिने नव्हते. तिला अंगभर कपडे देखील नव्हते* की

मूठभर मांस नव्हते.  

❕ती म्हणाली, *तुम्ही जाल तिकडे मी येईन*. स्वर्गात असो की नरकात .. कोणत्याही प्रकारचा जन्म असला तरी *मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. हे माझे तुम्हास वचन* आहे."

❕राजा थक्क होऊन समोर पहात राहिला, विचार करू लागला की, जिला मी प्रेम सोडा, *साधा प्रेमाचा शब्द कधी दिला नाही*, 

पूर्ण आयुष्यात जिची कधी एक क्षणभर देखील काळजी केली नाही, *ती आज माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करत आहे*?

 राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याने *मोठ्या समाधानाने आपला प्राण त्याग केला*.कोण होता तो राजा? *कोण होत्या त्या तीन राण्या*? कोण होती ती चौथी राणी? *इतके प्रेम देऊनही तिन्ही राण्यांनी राजाचा त्याग* का केला..?

❕त्या उलट ती चौथी राणी, जिच्याकडे राजाने कधीही लक्ष दिले नाही, पण *तरीही राजासाठी एवढा त्याग का केला*?

❕तो राजा *दुसरा तिसरा कोणीही नसून स्वतः आपणच* आहोत.

🔸आपली पहिली राणी, *जी आपल्याला जागेवरच सोडते* ते म्हणजे आपले *शरीर*! ज्याला आपण आयुष्यभर बघत रहातो.

🔸आपली *दुसरी राणी स्मशानापर्यंतच आपल्याला सोडण्यास येते*, ती म्हणजे आपली मुले, आप्तेष्ट, मित्र व *समाज.*

🔸आपली तिसरी राणी, *जी आपल्याला सोडून दुसऱ्याकडे जाते* ती म्हणजे, *धन-पैसा* . आपल्या मृत्युनंतर लगेच ती दुसऱ्याची होते.

🔸 आता सर्वात दुर्लक्षित *चौथी राणी म्हणजे* 

पुण्य , कर्म , माणुसकी , धर्म *जे आपण सदभावनेने , निःस्वार्थीपणे, आणि विना अहंकाराने* करावे , पण ते न करता, आपण जिच्याकडे बघण्यास अजिबात वेळ देत नसतो. *तरी पण ती जन्मोजन्मी आपल्या बरोबर येतच असते*......!!!!

एक चांगला विचार

 *जय.श्री कृष्ण*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi